शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

एकमेकांना समजून घेतल्यास संवाद सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:28 AM

जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करणे सुकर जाते, असे खा.अ‍ॅड.राजीव सातव म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करणे सुकर जाते, असे खा.अ‍ॅड.राजीव सातव म्हणाले.ते म्हणाले, कुठल्याही क्षेत्रात एखादी भूमिका चांगल्या पद्धतीने व पटेल अशा पद्धतीने मांडली तर लोकांना ते आवडते. राग, चिडचिडेपणा नसला तर लोकांच्या मनाचा ठाव घेवून त्याच्या कलाने वागता येते. त्यामुळे समोरच्याचे समाधान होते. लोकांच्या अपेक्षांनुसार काम करण्याची भूमिका ठेवल्यास आपल्याला रागापर्यंत पोहोचण्याची गरजच पडत नाही. त्यांना समजेल अशा पद्धतीने वागताना सयंमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर समोरच्यालाही चांगले वाटते. तरीही मानवी प्रवृत्तीत राग येणे साहजिक आहे. मात्र अशावेळी भीतीपोटी म्हणून नव्हे, तर आणखी चुका टाळण्यासाठी माघार घेणेच अधिक चांगले. कारण रागामुळे माणसे जोडण्याऐवजी दूर जातात. राजकीय क्षेत्रात काम करताना रोज शेकडो लोकांशी भेटी-गाठी होतात. नवनव्या समस्या समोर येतात. त्या सोडविताना कधी नियम-अटींचा विलंब होतो. अशावेळी राग नियंत्रणात ठेवत काम करून घ्यायचे म्हणजे कसरत होते.मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाने गुड बोला, गोड बोला आणि तसेच चांगले वागूया, असा संकल्प करण्याची गरज आहे. लोकमतने हाती घेतलेल्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा. खरेतर सर्वच दृष्टिने हा उपक्रम चांगला, आरोग्यदायी व अनुकरणीय आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक