शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘त्या’ दोन मुलांचे अपहरण झालेच नव्हते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:58 IST

शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे हिंगोली येथून पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुण्याला गेले. दोन्ही मुले पुणे येथील बालगृहात होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या दोन्ही मुलांनी आम्ही स्त:हूनच ट्रेनने पुण्याला गेलो, असे पोलिसांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे हिंगोली येथून पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुण्याला गेले. दोन्ही मुले पुणे येथील बालगृहात होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या दोन्ही मुलांनी आम्ही स्त:हूनच ट्रेनने पुण्याला गेलो, असे पोलिसांना सांगितले.हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील भानुदास सोनाजी बुक्कन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की हिंगोली शहरातील कमलानगर येथील अनाथ मुलांच्या बालगृहातून त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राचे कोणीतरी अपहरण केले. त्यामुळे याप्रकरणी बालकांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तसेच विविध पोलीस ठाण्यात दोन मुले मिसिंगची माहिती व त्यांचे फोटोही पाठविले होते. २५ डिसेंबर रोजी ही दोन्ही मुले पुणे येथील रेल्वेस्थानक परिसरात फिरत असताना तेथील पोलिसांना आढळून आली. त्यांनी हिंगोली येथील पोलिसांना मुले सापडल्याची माहिती दिली. हिंगोली येथीलच मुले आहेत, याबाबत खात्री केली त्यानंतर पोलिस पथक व मुलांचे पालक पुण्यात पोहचले. तेथील बालगृहातून मुलांना हिंगोली येथे आणण्यात आले. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोउपनि गोहाडे, बालकल्याण समिती सदस्या प्रा. जया करडेकर, प्रा. विक्रम जावळे, अधीक्षक परमिता कांबळे, अनिल शिंदे आदींनी महत्त्वाची भुमिका बजावली. दोघा मुलांचा शोध लागल्याने त्यांचे अपहरण झाले नव्हते हे स्पष्ट झाले. मुले सापडल्याने त्यांच्या पालकांना आनंद झाला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी