शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

हिंगोली जिल्ह्यात तुरीचे १२ कोटींची चुकारे लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:53 IST

जिल्ह्यात एकूण पाच केंद्रावरुन नाफेडने ६ हजार ३०६ शेतकऱ्यांची ३९ कोटी २१ लाख ९८ हजार ३५० रुपयाची ७१ हजार ९६३  क्विंंटल तूर खरेदी केली आहे.

ठळक मुद्दे २६ कोटी रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असले तरीही अजून बारा कोटी रुपयांचे चुकारे लटकलेले आहेत.  

हिंगोली : जिल्ह्यात एकूण पाच केंद्रावरुन नाफेडने ६ हजार ३०६ शेतकऱ्यांची ३९ कोटी २१ लाख ९८ हजार ३५० रुपयाची ७१ हजार ९६३  क्विंंटल तूर खरेदी केली आहे. मात्र २६ कोटी रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असले तरीही अजून बारा कोटी रुपयांचे चुकारे लटकलेले आहेत.  अधून - मधून पाऊस हजेरी लावत असल्याने, बळीराजा आता शेतीच्या कामाकडे वळला आहे. नाफेड केंद्रावर तूर विकण्याच्या नादात तर अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे रेंगाळलेली आहेत. २५ मेपर्यंत तूर विक्री केल्यानंतर  चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत शेतीची कामे आटोपून घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. मुख्य म्हणजे आता शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला तो खरिपाच्या पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीचा. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने नाफेडकडे तूर विक्री केली. मात्र शेवटी पेरणीसाठी पैसेच हाती पडलेले नाहीत.

अजूनही पाचही केंद्रांवरील हजारो शेतकरी चुकाऱ्यांसाठी हैराण आहेत. तर काही शेतकऱ्यांनी यंदाही उसनवारी करुन किंवा नातेवाईकांकडून खते, बियाणांसाठी पैशांची जुळवा-जुळव करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र खिशात दमडीही नसलेले शेतकरी केवळ खते बियणाच्या दराचा आढावाच घेत आहेत. त्यात भर म्हणजे बहुतांश बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासंमोर खरीप पेरणीचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. तर विशेष म्हणजे नोंदणी केलेल्या २० हजार शेतकऱ्यांची तूर खरेदीच केली नाही. अजून तरी वाढीव मुदत मिळालेली नाही. यातील किती जणांकडे तूर आहे, हेही कळायला मार्ग नाही. तर हरभरा खरेदीला मात्र १३ जूनपर्यंत वाढीव मुदत मिळाली आहे. मात्र पेरणीच्या गडबडीत हरभरा विक्रीसाठी कोणत्या शेतकऱ्याकडे वेळ असेल? हा गंभीर प्रश्चच आहे. 

अशी करण्यात आली खरेदी हिंगोली जिल्ह्यातील ५ ही केंद्रावर ३१ हजार १७५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून २५ मे पर्यंत केवळ ११ हजार ४ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली आहे. यामध्ये हिंगोली येथील केंद्रावर ७७५ शेतकऱ्याची ११ हजार २४९ क्विंटल, सेनगाव केंद्रावर १७१६ शेतकऱ्याची २३ हजार ४८४ क्विंटल, कळमनुरी केंद्रावर १२७९ शेतकऱ्यांची १४ हजार २११ क्विंटल आणि वसमत येथील केंद्रावर ९९७ शेतकऱ्याची ८ हजार १०८ क्विंटल, तर जवळा बाजार येथील केंद्रावर १५३९ शेतकऱ्यांची १४ हजार ९१० क्विंटल तूर खरेदी केली आहे. 

अशी दिली रक्कमजवळ्यात ८.१२ पैकी ७.६७ कोटी, वसमतला ४.४१ पैकी ७९.८१ लाख, कळमनुरीत ७.७४ पैकी १.८७ कोटी, हिंगोलीत ६.१३ पैकी २.८१ कोटी मार्केटिंग फेडरेशनने अदा केले. १२ कोटींची गरज आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डMONEYपैसाFarmerशेतकरी