शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत हळदीचे दर २५ टक्क्यांनी घटले; शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:42 IST

यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे.

ठळक मुद्देदोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.

- विजय पाटील हिंगोली : मागील तीन ते चार वर्षांत पहिल्यांदाच हळदीला नीचांकी दर मिळू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. साडेचार हजारांपर्यंत हळद खाली उतरली असून, तेवढा तर प्रतिक्विंटल शेतकऱ्यांचा लागवड खर्चच आहे. त्यामुळे वर्षभर राबूनही शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच येत आहे. मागील तीन ते चार वर्षांत शेतकऱ्यांना सरासरी सात ते दहा हजारांपर्यंत भाव मिळायचा. मात्र यावर्षी हळद काढणीच टाळेबंदीच्या काळात झाली. ती बाजारात आणताच सुरुवातीला पाच ते साडेपाच हजार व आता चक्क साडेचार हजारांपर्यंत दर घसरला आहे. तुरळक शेतकऱ्यांनाच पाच हजारांवर भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांत हळद खरेदी होते. हिंगोलीत साधारण दोन लाख क्विंटल, वसमतला ४ लाख क्ंिवटल, जवळ्यात एक लाख क्विंटल, सेनगावातही जवळपास ५0 ते ७0 हजार क्विंटल हळदीची आवक होते. ही परिस्थिती मागील दोन-तीन वर्षांतच झाली आहे. यापूर्वी एवढी आवक नसायची. विदर्भातूनही हळद येण्याचे प्रमाण वाढले. उसाची शेती कमी झाल्यानंतर याची जागा बहुतांश ठिकाणी हळदीने घेतली. आवक वाढली तसे दरही घसरत गेले आहेत.

२00८-0९ मध्ये २६ हजारांचा दरपाच वर्षांत हळद पिवळे करून सोडते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. हा सुवर्णयोग २00८ मध्ये आला होता. हळदीचे दर चक्क २६ हजारांपर्यंत गेले होते. साधारण हळदही १८ ते २0 हजार रुपये क्विंटलने विकली गेली होती. त्यानंतर हळदीचे क्षेत्र झपाट्याने वाढले. दर मात्र घसरतच गेले.

शेती परवडेल कशी?कुरुंदा येथील शेतकरी विष्णू राजे म्हणाले, आमची तिसरी पिढी हळदीचे उत्पादन घेत आहे. यापूर्वी हळद परवडायची. निम्मा तरी नफा मिळायचा. रासायनिक खत, न्यूट्रियंटस्, खोडअळीसारख्या प्रकारावर फवारणी, निंदण, बेड पद्धतीत वाढलेला लागवड खर्च, ठिबक, काढणीचे वाढलेले दर हे सर्व पाहता प्रतिक्ंिवटल खर्च साडेचार हजारांवर गेला आहे. एकरी पंधरा ते वीस क्ंिवटल उत्पादन होते. दर पाच हजारांच्या आत आल्यावर ही शेती परवडणार कशी, हा त्यांचा सवाल.

... तर भाव वाढेलव्यापारी प्रशांत सोनी म्हणाले, दर आमच्या हातात नसतात. यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे. निर्यातक्षम माल थेट सांगलीला जातो. त्याला दरही चांगला मिळतो. सध्या टाळेबंदीत प्रक्रिया उद्योग बंद आहेत. स्थानिक मजुरांचा खर्च वाढला. टाळेबंदी उठली तर भावात बदल पाहायला मिळू शकेल. दोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीagricultureशेती