शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

हिंगोलीत हळदीचे दर २५ टक्क्यांनी घटले; शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:42 IST

यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे.

ठळक मुद्देदोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.

- विजय पाटील हिंगोली : मागील तीन ते चार वर्षांत पहिल्यांदाच हळदीला नीचांकी दर मिळू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. साडेचार हजारांपर्यंत हळद खाली उतरली असून, तेवढा तर प्रतिक्विंटल शेतकऱ्यांचा लागवड खर्चच आहे. त्यामुळे वर्षभर राबूनही शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच येत आहे. मागील तीन ते चार वर्षांत शेतकऱ्यांना सरासरी सात ते दहा हजारांपर्यंत भाव मिळायचा. मात्र यावर्षी हळद काढणीच टाळेबंदीच्या काळात झाली. ती बाजारात आणताच सुरुवातीला पाच ते साडेपाच हजार व आता चक्क साडेचार हजारांपर्यंत दर घसरला आहे. तुरळक शेतकऱ्यांनाच पाच हजारांवर भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांत हळद खरेदी होते. हिंगोलीत साधारण दोन लाख क्विंटल, वसमतला ४ लाख क्ंिवटल, जवळ्यात एक लाख क्विंटल, सेनगावातही जवळपास ५0 ते ७0 हजार क्विंटल हळदीची आवक होते. ही परिस्थिती मागील दोन-तीन वर्षांतच झाली आहे. यापूर्वी एवढी आवक नसायची. विदर्भातूनही हळद येण्याचे प्रमाण वाढले. उसाची शेती कमी झाल्यानंतर याची जागा बहुतांश ठिकाणी हळदीने घेतली. आवक वाढली तसे दरही घसरत गेले आहेत.

२00८-0९ मध्ये २६ हजारांचा दरपाच वर्षांत हळद पिवळे करून सोडते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. हा सुवर्णयोग २00८ मध्ये आला होता. हळदीचे दर चक्क २६ हजारांपर्यंत गेले होते. साधारण हळदही १८ ते २0 हजार रुपये क्विंटलने विकली गेली होती. त्यानंतर हळदीचे क्षेत्र झपाट्याने वाढले. दर मात्र घसरतच गेले.

शेती परवडेल कशी?कुरुंदा येथील शेतकरी विष्णू राजे म्हणाले, आमची तिसरी पिढी हळदीचे उत्पादन घेत आहे. यापूर्वी हळद परवडायची. निम्मा तरी नफा मिळायचा. रासायनिक खत, न्यूट्रियंटस्, खोडअळीसारख्या प्रकारावर फवारणी, निंदण, बेड पद्धतीत वाढलेला लागवड खर्च, ठिबक, काढणीचे वाढलेले दर हे सर्व पाहता प्रतिक्ंिवटल खर्च साडेचार हजारांवर गेला आहे. एकरी पंधरा ते वीस क्ंिवटल उत्पादन होते. दर पाच हजारांच्या आत आल्यावर ही शेती परवडणार कशी, हा त्यांचा सवाल.

... तर भाव वाढेलव्यापारी प्रशांत सोनी म्हणाले, दर आमच्या हातात नसतात. यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे. निर्यातक्षम माल थेट सांगलीला जातो. त्याला दरही चांगला मिळतो. सध्या टाळेबंदीत प्रक्रिया उद्योग बंद आहेत. स्थानिक मजुरांचा खर्च वाढला. टाळेबंदी उठली तर भावात बदल पाहायला मिळू शकेल. दोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीagricultureशेती