शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By रमेश वाबळे | Updated: March 7, 2024 19:47 IST

नवी हळद येऊ लागली विक्रीला; मार्केटमध्ये आवक वाढली

हिंगोली : गत महिन्यात सरासरी १२ ते १३ हजारांपर्यंत घसरलेल्या हळदीला ७ मार्च रोजी भाववाढीची झळाळी मिळाली. १४ हजार ३०० ते १७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली, तर सरासरी १५ हजार ६१५ रुपये एवढा भाव राहिला. या दिवशी १ हजार १०० क्विंटल हळद विक्रीला आली होती.

मराठवाड्यासह सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील संत नामदेव मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबर २०२३ मध्ये हळदीला सरासरी १५ ते १६ हजारांचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यानंतर मात्र दरात घसरण होत गेली. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक ते दीड हजारांची घसरण झालेली डिसेंबर, जानेवारीत कायम राहिली, तर फेब्रुवारीत सरासरी भाव १२ ते १३ हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्रीविना ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, १ मार्चपासून सरासरी १४ हजारांवर भाव मिळत होता, तर ७ मार्च रोजी जवळपास एक हजार रुपयांची वाढ झाली. १ हजार १०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. १४ हजार ३०० ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलने हळद विक्री झाली. हळदीला भाववाढीची चकाकी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, सध्या नवीन हळदीची आवक अत्यल्प आहे; परंतु जवळपास एक महिन्यानंतर आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या काळात भाव कायम राहावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सोयाबीन कावडीमोल दरातच...यंदा सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा कायम आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत मागील तीन ते चार महिन्यांपासून सोयाबीन विक्रीविना ठेवले. मात्र, भाव काही वाढता वाढत नसल्याचे चित्र आहे. सध्या सरासरी ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. घटलेले उत्पादन आणि भाव याचा विचार केल्यास लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येणाऱ्या दिवसांतही भाववाढीची शक्यता धूसर असल्याने शेतकऱ्यांवर मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करण्याची वेळ आली आहे.

हरभऱ्याचेही दर वाढले...यंदा २०२३-२४ हंगामात शासनाने हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. एवढा भाव शेतकऱ्यांना मोंढ्यातही मिळत आहे. गुरुवारी मोंढ्यात १ हजार ३०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार १५० ते ५ हजार ६८० रुपयांदरम्यान भाव मिळाला. यंदा हरभऱ्याचा पेरा तब्बल १ लाख ५६ हजार ७५० एवढ्या क्षेत्रावर झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

तूर दहा हजारांवरच थांबली...यंदा तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आल्यामुळे किमान १२ हजारांवर भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. फेब्रुवारी महिन्यात एक- दोन दिवस ११ हजारांपर्यंत तुरीला भाव मिळाला; परंतुु त्यानंतर भावात घसरण झाली. गुरुवारी मोंढ्यात ४५० क्विंटलची आवक झाली होती. ९ हजार ५०० ते १० हजार ४०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. भाव वाढण्याऐवजी कमी झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डHingoliहिंगोली