शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मातीमोल भावात विकतेय मोंढ्यात तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:37 IST

यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच कधी निसर्ग, शासन तर कधी पडलेल्या दराने छळले. अजूनही हे शुक्लकाष्ट संपलेले नाही. मंगळवारी भुसार मोंढ्यात तुरीची अवघी साडेतीन हजार रुपये क्ंिवटल दराने खरेदी झाली. शासन हमीभाव ५४00 रुपयांचा असताना शेतकºयांना मातीमोल किमतीत आपला माल विकावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच कधी निसर्ग, शासन तर कधी पडलेल्या दराने छळले. अजूनही हे शुक्लकाष्ट संपलेले नाही. मंगळवारी भुसार मोंढ्यात तुरीची अवघी साडेतीन हजार रुपये क्ंिवटल दराने खरेदी झाली. शासन हमीभाव ५४00 रुपयांचा असताना शेतकºयांना मातीमोल किमतीत आपला माल विकावा लागला.हिंगोली जिल्ह्यातील १३ हजार ७२६ शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. यापैकी १५ मेपर्यंत जवळपास ६ हजार २0१ शेतकºयांची ६९ हजार ८0१ क्ंिवटल तूर नाफेडने पाच केंद्रांवर खरेदी केली होती. यामध्ये हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत, जवळा या केंद्रांचा समावेश होता. तरीही सात हजारांवर शेतकºयांचा माल नाफेडने खरेदी करणे बाकी होते. गोदामांमध्ये जागाच शिल्लक नसल्याच्या कारणावरून उर्वरित शेतकºयांची तूर खरेदी न करता ज्यांनी आॅनलाईन नोंदणी केली, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. त्यालाही खंडीभर निकषांची जोड दिली. त्याचा अजूनही काहीच मागमूस नाही. त्यासाठी अर्ज करायचे की अन्य काही, याचे कोणीही मार्गदर्शन करायला तयार नाही. अनेक शेतकºयांनी तर नोंदणीच केली नव्हती. आता सरसकट शेतकरी मोंढ्यात तूर विक्रीला आणत आहेत. तीनशे ते चारशे पोत्यांची आवक झाली असताना भाव मात्र साडेतीन हजारांवर गेला नाही. पेरणीची गरज भागविण्यासाठी रडकुंडीला येत शेतकरी हा माल या दराने विक्री करताना दिसत होते. भविष्यात हा दरही मिळेल की नाही, या भीतीने शेतकरी माल विकून शेतीखर्च भागवताना दिसत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी