शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

आदिवासी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून दरवर्षी १० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी व ...

राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून दरवर्षी १० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी व गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी हि शिष्यवृत्ती दिली जात आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत या शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारले जातात. यासाठी संबंधित विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जमाती संवर्गातील असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे. मात्र, नोकरी करणाऱ्यांसाठी वयोमर्यादा ४० वर्षापर्यंत आहे, तसेच एका कुटुंबातील एकाच विद्यार्थ्याला या योजनेला लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे, तसेच परदेशात ज्या विद्यापीठात त्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्याचे गुणांकन ३०० पर्यंत असले पाहिजे.

दरम्यान, या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापाठीचे माहितीपत्रक, प्रवेश पत्र, विद्यापीठाची शिष्यवृत्तीसाठी शिफारस, तसेच शुल्काचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्हयातील विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी सर्व कागदपत्रांसह त्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव ता. ६ सप्टेंबरपर्यंत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावे. हिंगोली जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बांगर यांनी केले आहे.