शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

वसमतमध्ये प्रस्थापितांना हादरा; तरुणांच्या बाजूने निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST

वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र ...

वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र समोर आले आहे. आमदार राजू पाटील नवघरे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे वसमत तालुक्यावर राष्ट्रवादी व नवघरे समर्थकांचा दबदबा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

वसमत विधानसभा मदारसंघाच्या निवडणुकीत आमदार राजू पाटील नवघरे यांना निवडून आणण्यात ‘आग्या मोहोळ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी उदयास आली होती. कोणत्याही पक्षाच्या व नेत्याच्या दावणीला नसलेले हे तरुण नवघरे यांच्या प्रचारात जिद्दीने उतरले होते. प्रतिकूल परिस्थितीत या आग्या मोहोळाने निकाल फिरवला होता. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही याच आग्या मोहोळाला पुढे करण्याची व्यूहरचना आमदार नवघरे यांनी आखली, विरोधी पक्ष नेते गाफील राहीले. विधानसभा लढविण्याचे मनसुबे बाळगणारे ग्रामपंचायत प्रचारात दिसले नाहीत. परिणामी एकट्या राजू पाटील नवघरे यांनी नव्या दमाच्या तरुणाईच्या मागे शक्ती उभी करून बाजी मारल्याचे चित्र आज समोर आले आहे.

आजवर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात प्रस्थापितांची चलती रहायची. यावेळी तरुणाई भारी ठरल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्या. सोबत नवघरे समर्थकांचीही संख्या मोठी आहे. या दोघांची बेरीज केली असता ७० ते ७५ टक्के एकट्या आमदारांच्या बाजूच्या ग्रामपंचायती आल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून अंग काढून घेतल्यासारखी अवस्था होती. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांचे गाव असलेल्या किन्होळा गावातही भाजपच्या पॅनेलला अपयश पहावे लागले. शिवसेनेला काही प्रमाणात आपले गड राखण्यात यश मिळविले. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा सक्रिय सहभाग फारसा प्रचारात दिसला नाही. कार्यकर्त्यांनी आपापल्या ताकतीने गड जिंकले. महाआघाडीच्या नावाने किती ग्रामपंचायती लढल्या व किती विजयी झाल्या व यात तीन पक्षांचे किती योगदान आहे हे यथावकाश समोर येईलच. परंतु, प्राथमिकदृष्ट्या नव्या दमाचे तरुण व राकाँचे वर्चस्व दिसत आहे.

कुरुंदा या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सभापती राजू पाटील इंगोले यांनी एकहाती सत्ता मिळविली. एका जागेसाठी निवडणूक झाली होती. ती जागाही इंगोले यांच्या पॅनेलचीच आली. राजेश पाटील इंगोले यांच्या कामगिरीने त्यांच्या नेतृत्व गुणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निकालासंदर्भात आमदार राजू पाटील नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत मतदार संघातील ७५ टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या दमाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने हे यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.