शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

वसमतमध्ये प्रस्थापितांना हादरा; तरुणांच्या बाजूने निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST

वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र ...

वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र समोर आले आहे. आमदार राजू पाटील नवघरे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे वसमत तालुक्यावर राष्ट्रवादी व नवघरे समर्थकांचा दबदबा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

वसमत विधानसभा मदारसंघाच्या निवडणुकीत आमदार राजू पाटील नवघरे यांना निवडून आणण्यात ‘आग्या मोहोळ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी उदयास आली होती. कोणत्याही पक्षाच्या व नेत्याच्या दावणीला नसलेले हे तरुण नवघरे यांच्या प्रचारात जिद्दीने उतरले होते. प्रतिकूल परिस्थितीत या आग्या मोहोळाने निकाल फिरवला होता. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही याच आग्या मोहोळाला पुढे करण्याची व्यूहरचना आमदार नवघरे यांनी आखली, विरोधी पक्ष नेते गाफील राहीले. विधानसभा लढविण्याचे मनसुबे बाळगणारे ग्रामपंचायत प्रचारात दिसले नाहीत. परिणामी एकट्या राजू पाटील नवघरे यांनी नव्या दमाच्या तरुणाईच्या मागे शक्ती उभी करून बाजी मारल्याचे चित्र आज समोर आले आहे.

आजवर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात प्रस्थापितांची चलती रहायची. यावेळी तरुणाई भारी ठरल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्या. सोबत नवघरे समर्थकांचीही संख्या मोठी आहे. या दोघांची बेरीज केली असता ७० ते ७५ टक्के एकट्या आमदारांच्या बाजूच्या ग्रामपंचायती आल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून अंग काढून घेतल्यासारखी अवस्था होती. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांचे गाव असलेल्या किन्होळा गावातही भाजपच्या पॅनेलला अपयश पहावे लागले. शिवसेनेला काही प्रमाणात आपले गड राखण्यात यश मिळविले. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा सक्रिय सहभाग फारसा प्रचारात दिसला नाही. कार्यकर्त्यांनी आपापल्या ताकतीने गड जिंकले. महाआघाडीच्या नावाने किती ग्रामपंचायती लढल्या व किती विजयी झाल्या व यात तीन पक्षांचे किती योगदान आहे हे यथावकाश समोर येईलच. परंतु, प्राथमिकदृष्ट्या नव्या दमाचे तरुण व राकाँचे वर्चस्व दिसत आहे.

कुरुंदा या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सभापती राजू पाटील इंगोले यांनी एकहाती सत्ता मिळविली. एका जागेसाठी निवडणूक झाली होती. ती जागाही इंगोले यांच्या पॅनेलचीच आली. राजेश पाटील इंगोले यांच्या कामगिरीने त्यांच्या नेतृत्व गुणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निकालासंदर्भात आमदार राजू पाटील नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत मतदार संघातील ७५ टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या दमाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने हे यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.