शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

वसमतमध्ये प्रस्थापितांना हादरा; तरुणांच्या बाजूने निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST

वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र ...

वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र समोर आले आहे. आमदार राजू पाटील नवघरे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे वसमत तालुक्यावर राष्ट्रवादी व नवघरे समर्थकांचा दबदबा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

वसमत विधानसभा मदारसंघाच्या निवडणुकीत आमदार राजू पाटील नवघरे यांना निवडून आणण्यात ‘आग्या मोहोळ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी उदयास आली होती. कोणत्याही पक्षाच्या व नेत्याच्या दावणीला नसलेले हे तरुण नवघरे यांच्या प्रचारात जिद्दीने उतरले होते. प्रतिकूल परिस्थितीत या आग्या मोहोळाने निकाल फिरवला होता. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही याच आग्या मोहोळाला पुढे करण्याची व्यूहरचना आमदार नवघरे यांनी आखली, विरोधी पक्ष नेते गाफील राहीले. विधानसभा लढविण्याचे मनसुबे बाळगणारे ग्रामपंचायत प्रचारात दिसले नाहीत. परिणामी एकट्या राजू पाटील नवघरे यांनी नव्या दमाच्या तरुणाईच्या मागे शक्ती उभी करून बाजी मारल्याचे चित्र आज समोर आले आहे.

आजवर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात प्रस्थापितांची चलती रहायची. यावेळी तरुणाई भारी ठरल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्या. सोबत नवघरे समर्थकांचीही संख्या मोठी आहे. या दोघांची बेरीज केली असता ७० ते ७५ टक्के एकट्या आमदारांच्या बाजूच्या ग्रामपंचायती आल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून अंग काढून घेतल्यासारखी अवस्था होती. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांचे गाव असलेल्या किन्होळा गावातही भाजपच्या पॅनेलला अपयश पहावे लागले. शिवसेनेला काही प्रमाणात आपले गड राखण्यात यश मिळविले. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा सक्रिय सहभाग फारसा प्रचारात दिसला नाही. कार्यकर्त्यांनी आपापल्या ताकतीने गड जिंकले. महाआघाडीच्या नावाने किती ग्रामपंचायती लढल्या व किती विजयी झाल्या व यात तीन पक्षांचे किती योगदान आहे हे यथावकाश समोर येईलच. परंतु, प्राथमिकदृष्ट्या नव्या दमाचे तरुण व राकाँचे वर्चस्व दिसत आहे.

कुरुंदा या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सभापती राजू पाटील इंगोले यांनी एकहाती सत्ता मिळविली. एका जागेसाठी निवडणूक झाली होती. ती जागाही इंगोले यांच्या पॅनेलचीच आली. राजेश पाटील इंगोले यांच्या कामगिरीने त्यांच्या नेतृत्व गुणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निकालासंदर्भात आमदार राजू पाटील नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत मतदार संघातील ७५ टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या दमाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने हे यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.