शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘इसापूर’ची सात आवर्तने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:06 IST

परिसरात रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची पातळी आतापासूनच खालावल्याने शेतकरी चिंतेत होते. मुंबई येथे नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात इसापूर धरणाच्या उजवा कालव्यासाठी सात पाणीपाळ्या देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये रबीसाठी ३ तर उन्हाळी करिता ४ आवर्तने दिले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : परिसरात रबी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची पातळी आतापासूनच खालावल्याने शेतकरी चिंतेत होते. मुंबई येथे नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात इसापूर धरणाच्या उजवा कालव्यासाठी सात पाणीपाळ्या देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये रबीसाठी ३ तर उन्हाळी करिता ४ आवर्तने दिले जाणार आहेत.कुरुंदा हा भाग सिंचनाखाली येतो. इसापूर धरणाच्या पाण्यावर रबी हंगाम व बागायती पिके अवलंबून असतात. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लक्ष इसापूर धरणाच्या पाणीपाळ्यांकडे लागलेले होते. या भागात आतापासूनच पाण्याची पातळी खालावली असून दुष्काळी अवस्था निर्माण झाली. तर विहिरी व तलाव तळ गाठू लागले आहेत. त्यात रबी हंगाम धोक्यात आल्यात जमा होता. या भागामध्ये पाणीपातळी घसरलेली असली तरीही हळदीचे उत्पादन ठिबकच्या साह्याने वाचविल्या जाते. शेतकरी रबी पेरणीच्या विवंचणेत होते. इसापूर धरणाच्या पाणीपाळ्याकडे जाहीर होण्याकडे कुरुंदा भागातील शेतकºयांचे लक्ष लागलेले होते .मुंबई येथे १६ आॅक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा विभागाने घेतली. त्यात इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याकरिता पाणीपाळीची आवर्तणे निश्चित करण्यात आली. त्यामुळे भाटेगाव कालव्याला सात पाणीपाळ्या मिळणार आहेत. तीन हिवाळी तर चार उन्हाळी आवर्तने दिली जातील. येत्या पाच नोव्हेंबर रोजी पहिली पाणीपाळी या भागात दिली जाणार आहे. सात पाणीपाळया निश्चित करण्यात आल्याने रब्बी पेरणीला इसापूर धरणाचे पाणी फायदेशीर ठेरणार आहे. पहिल्या आवर्तनानंतर या भागात रबी पेरणीला गती मिळणार आहे .

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी