शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आता मराठा समाज थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे

By विजय पाटील | Updated: October 2, 2023 19:09 IST

मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवून घेणारच आहोत.

हिंगोली: सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन गोरगरीब मराठा समाजाचे ऋण फेडावे. दुसरे म्हणजे मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार वेळ दिला आहे. तेंव्हा सरकारने विलंब न लावता मराठा समाजाला तातडीने सरसकट आरक्षण द्यावे, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी केले.

२ ऑक्टोबर रोजी वसमत तालुक्यातील  कुरुंदा येथे मराठा आरक्षण ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. सदरील सभेत जिल्हाभरातून सकल मराठा समाज आला होता. यावेळी मनोज जरांगे - पाटील यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जरांगे - पाटील म्हणाले, उपोषणादरम्यान सरकारने वेळ मागितला. त्यामुळे ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता मराठा समाज थांबणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवून घेणारच आहोत.

आंदोलन करा; पण शांततेने...मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मराठा समाजाने एक करायचे ते म्हणजे आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. कुठेही उद्रेक होता कामा नये. उद्रेक केला तर सरकारला बोलायला वाव मिळणार आहे. आता हा आरक्षणाचा अंतिम टप्पा राहणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सभेला येण्याचे आवाहनही यावेळी जरांगे - पाटील यांनी केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण