शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

औंढा पोलिस ठाणे इमारतीच्या छताचे प्लास्टर निखळले; जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:30 IST

औंढा पोलिस ठाण्यातील प्रकार; निजामकालीन इमारतीत चालतो कारभार

हिंगोली: औंढा नागनाथ येथील पोलिस ठाण्यातील इमारतीच्या छताचे प्लास्टर ५ जून रोजी दुपारी अचानक निखळले. ही घटना घडली त्यावेळी पोलिस कर्मचारी बाहेर होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ‘लोकमत’ ने याबाबत एका दिवसापूर्वीच पोलिस ठाण्यासह वसाहतीची दुरवस्था झाल्याची बातमी प्रकाशित केली होती.

औंढा नागनाथ येथील पोलिस ठाण्याच्या कारभार जीर्ण झालेल्या निजामकालीन इमारतीतून चालतो आहे. तसेच त्यांनतर बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीसह पोलिस वसाहतीचे बांधकाम जुने आहे. त्यामुळे इमारतीच्या भिंती व छतामध्ये पाणी झिरपून इमारती कमकुवत झाल्या आहेत. गत काही वर्षांपासून पोलिस ठाण्याची मुख्य इमारत धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाकडून कळविण्यात आले. त्यानंतरही इतरत्र व्यवस्था नसल्यामुळे जीर्ण इमारतीतून कारभार चालविला जात आहे. जीर्ण झालेल्या इमारती व अपुऱ्या जागेमुळे गुन्हेगारांच्या विविध दस्तावेजांसह पोलिस हत्यारे ठेवण्यास सुद्धा जागा उपलब्ध नसल्याचे कळते. मोठ्या पावसालाच सुरुवात होण्यापूर्वीच छताचे प्लास्टर निखळल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नेमके बसायचे कुठे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जेवणासाठी बाहेर पडले अन् छताचे प्लास्टर निखळले....दुपारी जेवणाची वेळ होत असल्यामुळे कर्मचारी बाहेर पडले आणि काही क्षणातच त्या छताचे प्लास्टर निखळले. जेवणाच्या निमित्ताने बाहेर आल्यामुळे सुदैवाने कुणासही कोणत्याही प्रकारची इजा पोहचली नाही.

पोलिस निरीक्षिकांचे कार्यालय स्थलांतरित...जीर्णावस्थेत असलेल्या निजामकालीन इमारतीत असलेले पोलिस निरीक्षकांचे कार्यालय कालच्या घटनेमुळे स्थलांतरित केले आहे. त्यानंतर ते येथील महिला समुपदेशनासाठी असलेल्या इमारतीत हलविण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था झाली असली तरी पोलिस ठाण्यातील इतर कामकाजासाठी व पोलिसांचे निवासस्थान असलेल्या वासहतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसह वसाहतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस