शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश

By रमेश वाबळे | Updated: October 29, 2023 13:33 IST

आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटला असून, खेडोपाडी उपोषण करण्यात येत आहे

रमेश वाबळे/ हिंगोली

हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत असून, नांदेड व बीड जिल्ह्यात शनिवारी एसटीबस पेटवून दिल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सावध पवित्रा घेतला असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही आगारातून बस बाहेर न काढण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी आगारप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेनंतर बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटला असून, खेडोपाडी उपोषण करण्यात येत आहे. तसेच सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदीही करण्यात आली आहे. यासंदर्भात गावसीमेवर फलक लावण्यात आले आहेत. शासनाची उदासीनता पाहून मराठा समाजबांधवात संताप व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी या तिन्ही आगारातील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील मोठे आगार म्हणून हिंगोली आगाराकडे पाहिले जाते. या आगारातून दिवसभरात ३७० फेऱ्या होतात. रविवारी दुपारी १ वाजेपासून जवळपास २०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वसमत व कळमनुरी आगारातूनही दुपारनंतर एकही बस बाहेर सोडण्यात येणार नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खबरदारी म्हणून बसफेऱ्या रद्द...मराठा समाजबांधवांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या सर्वत्र आंदोलन सुरू आहे. शनिवारी बीड व नांदेड जिल्ह्यात बस पेटविण्यात आल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर काही अनुचित घटना घडू नये म्हणून बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाची धग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, एसटी महामंडळाचे अधिकारी पोलिस विभागाच्या संपर्कात आहेत. सायंकाळी ५ नंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.- सचिन डफळे,विभागीय नियंत्रक

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाHingoliहिंगोलीBus Driverबसचालक