शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'शेती अन् पिकही आमचे'; दमदाटी करत दीराने भावजयीच्या शेतातून २५ क्विंटल हळद पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:45 IST

वसमत तालुक्यातील फाटा शिवारातील घटना; नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

वसमत (जि. हिंगोली) : शेत जमीन व त्यातील शेतमाल आमचा आहे, दमदाटी करत जवळपास २५ क्विंटल हळद पळवून नेल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी फाटा शिवारात घडला. याप्रकरणी फिर्यादीनंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वसमत तालुक्यातील फाटा शिवारातील शेत जमीनीचा दीर व भावजयीत वाद आहे. भावजयीने पिकवलेली हळद दिराने गैर कायद्याची मंडळी जमवून शेती आमची आहे शेतातील शेतीमाल पण आमचा आसे म्हणत हळदीचे ४८ कट्टे अंदाजे ३ लाख ७५ हजार रुपयांची २५ क्विंटल हळद पळवली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वसमत तालुक्यातील फाटा शिवारातील शेत जमिनीबाबत अकोली येथील ताराबाई माणिकराव कदम (५५) आणि विठ्ठल कदम या भावजयी व दिर यांच्यात वाद आहेत. या वादातून १ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता फाटा शिवारातील शेतात ताराबाई कदम यांना विठ्ठल कदम, गोविंद कदम, गोपाळ कदम, मारुती कदम, ज्ञानेश्वर कदम (सर्व रा.अकोली) दाऊत कल्याणकर, सुदर्शन कल्याणकर, (दोघे रा खरबी ता भोकर जि नांदेड) आणि तर दोघांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच शेती आमची आहे, शेतमाल आमचा आहे, असे म्हणत त्यांनी ३ लाख ७५ हजार रुपयांची २५ क्विंटल हळद वाहनात टाकून पळवून नेली. 

दरम्यान, याप्रकरणी ताराबाई कदम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि गजानन बोराटे, अजय पंडित यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली