शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:48 PM

सिद्धेश्वर धरणाची दहा गेट उघडून 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण २७ गावांना सतर्कतेचा इशारा

औंढा नागनाथ (हिंगोली ):  तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने सोमवारी रात्री 10 वाजाता दहा गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या आवक वाढत गेली तर सळणा येथील पूल पाण्याखाली येऊन नांदेड-औरंगाबाद हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाची दहा गेट उघडून 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. या दरवाजे दहा फुटाने वर घेत पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मातामाथा येथील पुलाच्या खालोखाल नदीपात्रातील पाणी वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढत गेला तर येथून जाणारा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

त्याचप्रमाणे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण २७ गावांना देखील महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रातील पाणी पातळी वाढली असल्याने गावातील छोट्या ओढ्यांमधील पाणी या पात्रात येण्यास अटकाव होत आहे. यामुळे ओढ्यांचे पाणी आजुबाजुच्या शेतामध्ये जाऊन तुंबलेले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली आहे.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदीHingoliहिंगोलीRainपाऊस