शिक्षक विचारताहेत, आम्ही शाळेत का जायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:07+5:302021-04-09T04:32:07+5:30

याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शाळा बंद असल्या तरीही कार्यालये सुरू आहेत. शिक्षकांची संख्या जास्त असेल तर आणि वर्गखोल्या ...

Teachers ask, why do we go to school? | शिक्षक विचारताहेत, आम्ही शाळेत का जायचे?

शिक्षक विचारताहेत, आम्ही शाळेत का जायचे?

याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के म्हणाले, शाळा बंद असल्या तरीही कार्यालये सुरू आहेत. शिक्षकांची संख्या जास्त असेल तर आणि वर्गखोल्या कमी असतील तर ५० टक्के उपस्थितीत अन्यथा १०० टक्के उपस्थितीत प्रलंबित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. यूडायसवर माहिती भरणे, शाळा सिद्धीची माहिती भरणे, स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थ्यांचा १०० टक्के सहभाग नोंदविणे, रीड टू मी उपक्रमातून इंग्रजीचा सराव, दीक्षा अॅपच्या वापरावर जाणीवजागृती करणे, सर्व्हे, विद्यार्थी प्रगती पुस्तक भरणे, लोकजागृती, सुंदर माझी शाळात सहभाग घेणे अशा अनेक बाबींवर काम करायचे आहे. त्यामुळे कुणीही शाळा बंद म्हणून शाळेत जायचे नाही, असा समज करून घेवू नये, असेही ते म्हणाले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे यांनीही आधार जोडणी, युडायससह इतर अनेक बाबींची कामे प्रलंबित आहेत. फिट इंडियाचे कामही अनेक शाळांनी केले नाही. त्यामुळे अशा उपक्रमांची कामे करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Web Title: Teachers ask, why do we go to school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.