शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:13 PM

१५0 म्हशी-वघारींचा संसार जीवापाड जपण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

ठळक मुद्देदुष्काळामुळे दुग्धव्यवसाय अडचणीतचारा-पाण्याचा खर्च कैक पटींनी वाढला

- विजय पाटील

हिंगोली : मुलांप्रमाणेच गुरांनाही जिवापाड जपणारे शेतकरी अजून असल्याने तोट्याचा म्हटला जात असला तरी शेतीव्यवसाय सुरू आहे. हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण तलाव भरला.

यंदा हिंगोलीत तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. गुरांचे चारापाणी करणे अवघड बनले आहे. जलस्त्रोत झपाट्याने आटत आहेत. मांडगे यांचीही १00 फूट खोल विहीर आटली. कयाधू नदीत घेतलेला एक बोअर अर्धा तास चालतो. त्यात म्हशींची तहानही भागत नाही. मग त्यांचा जलतरण तलाव भरण्याचा प्रश्न होता. शेजारच्या एका शेतकऱ्याकडून पाणी घेऊन ही निकड भागविली. दिवसा चारा-पाणी केल्यानंतर दुपारी या तलावात सोडायचे. सायंकाळी शेडमध्येच तुषाराप्रमाणे थंड फवारे अंगावर पडणारी यंत्रणा आहे. ती मध्यरात्रीपर्यंत चालवावी लागते. तिला कमी पाणी लागते. दर दोन ते तीन दिवसांनी तरण तलावातील पाणी बदलावे लागते. हे पाणी शेडमधील मलमुत्रासह तेथे आलेले असल्याने ते चारा पिकांना गाळून सोडले जाते. त्यामुळे पीकही चांगले येते. शिवाय म्हशी तलावातून धुवून बाहेर निघण्यासाठीच्या खास व्यवस्थेला रोज पाणी लागते. हजारो लिटर पाण्याची ही गरज भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ही व्यवस्था न केल्यास म्हशींना उन्हाळ्यात तग धरणेच कठीण असते. प्रसंगी त्यांच्या जिवाचीही भीती. त्यामुळे म्हशींना जपायचे व दुग्धव्यवसाय करायचा तर एखादे वर्ष असे म्हणून मांडगे यांनी संगोपनात कुठलीच कसर ठेवली नाही. याशिवाय कडबा कुट्टी, कडबा व दूध वाहतुकीची वाहने, वीज नसल्यास पर्याय म्हणून दोन जनरेटर, दूध साठविण्यास फ्रीजर तसेच लाखोंचा खर्च करून उभारलेले शेड, जलतरण तलाव व म्हशींना फिरविण्यासाठीचे संरक्षक भिंतीसह मैदान या वेगळ्याच बाबी. व्यवसाय करताना हळूहळू हे निर्माण केली तरीही तेही सांभाळावेच लागते. त्याचबरोबर सात ते आठ सालदारही शेतीसह या कामावर जुंपलेले असतात. घरचे किशनराव मांडगे यांच्या चार मुलांचे कुटुंबही इतर कामे सांभाळून यात राबते. तिसरी पिढीही झटत आहे. यात सर्वाधिक वाटा बाजीराव मांडगे यांचा. तर अशोक, सुभाष मांडगे हेही शेतीतील इतर कामांत मदत करतात. सर्वांत थोरले रामेश्वर हे मार्गदर्शन व इतर व्यवहार सांभाळतात.

१५0 म्हशी-वघारींचा संसार मांडगे यांच्याकडे म्हशी व वघारी मिळून १५0 आहेत. यापैकी म्हशी ९0. त्यातील ७५ टक्के दुभत्या. मात्र पाण्याअभावी बेताचाच चारा मिळाला. येलदरी येथील २५ एकर ऊस विकत घेतला. आतापर्यंत ३00 टन ऊस खाद्य म्हणून लागला. ३ हजार रुपये प्रतिटन त्याचा भाव आहे. सोबतीला तीन हजार रुपये क्विंटलचे ढेप आदी पशुखाद्य. दरवर्षीपेक्षा यंदा दरही वाढले. घरचा चाराही नाही. त्यामुळे हरभरा, टाळकीचे कुटारही विकतच घेतले.

खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ अवघडबाजीराव मांडगे म्हणाले, वडिलांनी अडीच एकर जमीन व एका म्हशीवर दुग्धव्यवसाय सुरू केला. आज कुटुंबाची ९५ एकर जमीन आहे. दीडशे म्हशी आहेत. कुठल्याही अनुदानावर नव्हे, तर कुटुंबाच्या मेहनतीवर हे उभे राहिले. यामुळेच आमची ओळख निर्माण झाली. त्यामुळे हे पशुधन जिवापाड जपलेच पाहिजे. यंदा दुष्काळ नसता तर पाचशे लिटर दूध विक्री करता आली असते. मात्र अशाही परिस्थितीत साडेतीनशे लिटरच्या आसपास दूध मिळते. खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ अवघड झाला. मात्र या पशुधनासाठी जे करतोय ते कमीच आहे. कामाला असलेली माणसंही जपायची आहेत. एखादे वर्ष असेही. म्हणून कुणापुढे हात थोडी पसरता येणार आहे. यंदा दुष्काळामुळे आपल्याच भागात अनेक ठिकाणी गुरांना चाराही मिळत नाही. त्यांच्या पशुधनाचे हाल होत आहेत. ते बघवत नाही. शासनाने त्यांच्यासाठी तरी चारा छावण्यांची सोय केली पाहिजे. 

पशुधन टिकवावे लागेल पशुधनामुळेच शेतीत प्रगती करता येते. त्यांच्या मलमुत्रामुळे शेतीचे उत्पादन चांगले येते. शिवाय रसायनमुक्त असते. दुग्धव्यवसायातून जोडधंदाही होतो. चांगले करायचा प्रयत्न केला. यश मिळत गेले. आता हे पशुधन टिकवावेच लागेल. दुष्काळात माणसांना कुठेही जाता येईल. या मुक्या प्राण्यांची तर आपणच काळजी घेतली पाहिजे. - किशनराव मांडगे 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmilkदूधdroughtदुष्काळ