शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

शिक्षण प्राधान्याचा विषय; शिक्षकांना अतिरिक्त काम पडणार नाही याची काळजी घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 19:53 IST

राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या शालेय बसची सुरक्षितता तपासून घेण्यात येणार आहेत.

हिंगोली : शिक्षण हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामांचा बोजा पडणार नाही याची शासन काळजी घेणार आहे. तर राज्यातील साडे तीन लाख शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील फरक दिल्याचेही शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

येथील संत नामदेव कवायत मैदानावर गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी. खा. राजीव सातव, माजी. आ. डॉ. सतीश टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ एच.पी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, जगदिश मिणीयार, चंद्रकांत सूर्यवंशी, यशवंत काळे यांची उपस्थिती होती. 

गायकवाड म्हणाल्या,  म.फुले कर्जमुक्ती योजनेत १ एप्रिल २0१५ ते ३१ मार्च २0१९ पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाची ३0 सप्टेंबर २0१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम २ लाखापर्यंत आहे, अशा शेतकयांना जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात पुनर्गठन/फेर पुनर्गठन केल्यासही लाभ मिळेल. यासाठी शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्जखात्याशी संलग्न करुन त्याचे प्रमाणीकरण करुन घ्यावे. प्रत्येक तहसील कार्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना केल्याचेही त्या म्हणाल्या. 

त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळा कोणतेही शासकीय अनुदान न घेता डिजिटल झाल्या आहेत. राज्यात सर्व शाळांमधील वीजपुरवठा आणि विजेवरील खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी सौरऊर्जा उपकरणे बसवण्याचा व  ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या शालेय बसची सुरक्षितता तपासून घेण्यात येणार आहेत. शिक्षण हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामांचा बोजा पडणार नाही याची शासन काळजी घेणार आहे. तर राज्यातील साडे तीन लाख शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील फरक दिल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीVarsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षणTeacherशिक्षक