शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महावितरणच्या विरोधात सेनगाव ते रिसोड रस्त्यावर शेतकऱ्यांचा तीन तास रास्ता रोको

By विजय पाटील | Updated: October 4, 2023 16:18 IST

लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे; दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प

हिंगोली: वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे सेनगाव तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी एकत्र येऊन सेनगाव येथील टी पॉइंटजवळील रस्त्यावर जवळपास तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

सेनगाव शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण सेवा मोठ्या प्रमाणात ढेपाळली आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रोहित्र नादुरुस्त असून वीज वितरण बिघडले आहेत. अनेक कृषी पंपाचा वीजपुरवठा दिवसभर बंद राहत आहे. वीज बिल वसुलीचे कारण देऊन वीज वितरण कंपनीचे अधिकारी लक्ष देत नाहीत. महावितरण कंपनीला सांगूनही काही उपयोग होत नाही. अधिकाऱ्यांची वाट पाहून शेतकऱ्यांना रोहित्र दुरुस्त करावी लागत आहेत.

अनेक भागात दिवसाला जेमतेम तीन ते चार तासही वीज मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी येथील हिंगोली ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर जिंतूर टी-पॉइंट येथे शेतकऱ्यांनी ४ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास तीन तास झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाले होती. वीज वितरण कंपनीच्या विरोधातील भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

रास्ता रोको आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख रमेश शिंदे, शेतकरी संघटनेचे माधव गाडे राष्ट्रवादीचे हिंगोली तालुकाध्यक्ष डॉ. माधव कोरडे, माजी उपसभापती भिकाजी अवचार, एकनाथ शिंदे, ममताज हिंगमिरे, नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाला होते.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे...यावेळी वीज वितरण कंपनीच्या वतीने सहायक उपअभियंता सत्यनारायण वडगावकर, कनिष्ठ अभियंता पंकज घुहे यांनी लेखी आश्वासन दिले. यानंतर हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक रंजीत भोईटे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली