शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

विद्युत रोहित्रासाठी रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:08 PM

वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआडगाव रंजे : वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.बोरी सावंत गावातील गावठाणचे दोन रोहित्र गत दोन महिन्यांपासून जळाल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. गावातील नवीन रोहित्राचे कामे अपूर्ण झाले आहे. त्याबरोबरच सौभाग्य योजनेत मीटर बसविणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आदी मागण्यांसंबंधी ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदने देऊनही समस्या सुटत नव्हती. त्यामुळे गावकरी मंडळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोलीचे उपकार्यकारी अभियंता अब्दुल जब्बार, वसमतचे वरिष्ठ अभियंता एस.एस. कादरी तसेच हट्ट्याचे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी आंदोलनस्थळी येऊन रोहित्र बसवण्याबरोबरच इतर मागण्या पूर्ण केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामध्ये गावातील एका गावठाण रोहित्राचे काम ओपीडीसी योजनेंतर्गत रखडले होते. ते दोनच दिवसांत पूर्ण केले जाईल, गावातील दोन रोहित्र नादुरुस्त आहेत. आॅईल आल्यानंतर त्या रोहित्रांची दुरुस्ती करुन लवकरात लवकर देण्यात येईल, रोहित्राच्या दुरुस्तीबरोबरच केबल व किटकॅट बॉक्स लवकरच देण्यात येईल, सौभाग्य योजनेची कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, बोरी उपकेंद्रात साहित्य देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात लवकरच पाठवण्यात येईल, हे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. या लेखी अश्वासनावर सरपंचासह पंचाच्या स्वाक्षºया आहेत. लगेच एक डी.पी. पाठवून दिला. तसेच शिल्लक कामे लवकर करण्याचे लेखी दिल्यामुळे गामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.यावेळी माणिकराव सावंत, रोहिदासराव सावंत, मदन कºहाळे, भगवानराव सावंत, तुकाराम सावंत, मुरलीधर सावंत, राजू सावंत, मुंजाजी सावंत, दादाराव क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हट्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.ग्रामस्थांनी मागण्यांसाठी अनेकदा महावितरणला निवेदने दिली. त्याला महावितरणच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली, निवेदनांचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळेच मागण्या मान्य करुन घेण्यासाठी बोरी सावंत ग्रामस्थांवर रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलनस्थळी महावितरणचे अधिकारी दाखल झाल्यानंतर अधिकाºयांना घेराव घातला. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अन्यथा आंदोलनात अनुचित प्रकारही घडला असता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा