शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

By विजय पाटील | Updated: May 27, 2024 15:55 IST

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.६१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत १६ हजार ३०० पैकी १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीतही मुलींनीच बाजी मारली.

हिंगोली जिल्हा औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेवटच्या स्थानी दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ८ हजार ६२८ मुले तर ७ हजार ६७२ मुली परीक्षेला बसले होते. यापैकी ८५१५ मुले तर ७५७९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. एकूण १६ हजार ९४ जणांनी परीक्षा दिली. यातील ७ हजार ४९७ मुले तर ७ हजार २४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.०४ टक्के तरी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६१ टक्के आहे. एकूण ९१.६१ टक्के निकाल लागला आहे.

नियमित परीक्षा १५ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली. नियमितचा निकाल ९२.२२ टक्के लागला आहे. तर रिपीटर्सची ३२१ पैकी ३०५ जणांनी परीक्षा दिली. यात १८३ जण उत्तीर्ण झाली. यात ६० टक्के निकाल लागला आहे.

वसमतचा सर्वाधिक ९४.२६ टक्क्यांवरवसमत तालुक्यातून ४३०६ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ४२९१ जणांनी परीक्षा दिली. यात २१५८ मुले तर १८८७ मुली उत्तीर्ण झाल्या. ४०४५ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.०२ तर मुलींचे ९६.९६ टक्के आहे. एकूण निकाल ९४.२६ टक्के आहे.

सेनगाव, औंढा ९३ टक्क्यांवरसेनगाव तालुक्यात २३४१ जणांनी नोंदणी केली. तर २२९२ जणांनी परीक्षा दिली. यातील २१४५ उत्तीर्ण झाले. यात ११३८ मुले तर १००७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५३ तर मुलींचे तब्बल ९७.२९ टक्के आहे. औंढा तालुक्यात नोंदणीकृत २०२३ पैकी २०१० जणांनी परीक्षा दिली. १८७५ जण उत्तीर्ण झाले.यात ७९७ तर मुली १०७८ उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७५ तर मुलींचे ९६.०७ टक्के आहे.

कळमनुरीत ९१.२७ टक्केकळमनुरी तालुक्यात नोंदणीकृत ३२२४ पैकी ३१९९ जण परीक्षेला बसले. यातील २९२० जण उत्तीर्ण झाले. यात १४४५ मुले तर १४७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे ८७.२० तर मुलींचे ९५.६५ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. एकूण ९१.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सर्वांत मागे हिंगोली तालुकाहिंगोली तालुक्यात नोंदणीकृत ४०८५ पैकी ३९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३५७६ जण उत्तीर्ण झाले. यातील १८३३ मुले तर १७४३ मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५३ तर मुलांचे ९४.०१ टक्के आहे.

४५६२ मुले विशेष प्राविण्यातहिंगोली जिल्ह्यातील नियमितच्या १५ हजार ९७९ पैकी १५७८९ जणांनी परीक्षा दिली. यातील ४५६२ विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले. ५१३२ मुले प्रथम श्रेणीत, ३८११ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर १०५६ काठावर पास झाले. रीपीटरमध्ये २६ पैकी ५ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय श्रेणीत तर ७ फक्त उत्तीर्ण झाले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालHingoliहिंगोली