शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

By विजय पाटील | Updated: May 27, 2024 15:55 IST

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.६१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत १६ हजार ३०० पैकी १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीतही मुलींनीच बाजी मारली.

हिंगोली जिल्हा औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेवटच्या स्थानी दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ८ हजार ६२८ मुले तर ७ हजार ६७२ मुली परीक्षेला बसले होते. यापैकी ८५१५ मुले तर ७५७९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. एकूण १६ हजार ९४ जणांनी परीक्षा दिली. यातील ७ हजार ४९७ मुले तर ७ हजार २४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.०४ टक्के तरी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६१ टक्के आहे. एकूण ९१.६१ टक्के निकाल लागला आहे.

नियमित परीक्षा १५ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली. नियमितचा निकाल ९२.२२ टक्के लागला आहे. तर रिपीटर्सची ३२१ पैकी ३०५ जणांनी परीक्षा दिली. यात १८३ जण उत्तीर्ण झाली. यात ६० टक्के निकाल लागला आहे.

वसमतचा सर्वाधिक ९४.२६ टक्क्यांवरवसमत तालुक्यातून ४३०६ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ४२९१ जणांनी परीक्षा दिली. यात २१५८ मुले तर १८८७ मुली उत्तीर्ण झाल्या. ४०४५ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.०२ तर मुलींचे ९६.९६ टक्के आहे. एकूण निकाल ९४.२६ टक्के आहे.

सेनगाव, औंढा ९३ टक्क्यांवरसेनगाव तालुक्यात २३४१ जणांनी नोंदणी केली. तर २२९२ जणांनी परीक्षा दिली. यातील २१४५ उत्तीर्ण झाले. यात ११३८ मुले तर १००७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५३ तर मुलींचे तब्बल ९७.२९ टक्के आहे. औंढा तालुक्यात नोंदणीकृत २०२३ पैकी २०१० जणांनी परीक्षा दिली. १८७५ जण उत्तीर्ण झाले.यात ७९७ तर मुली १०७८ उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७५ तर मुलींचे ९६.०७ टक्के आहे.

कळमनुरीत ९१.२७ टक्केकळमनुरी तालुक्यात नोंदणीकृत ३२२४ पैकी ३१९९ जण परीक्षेला बसले. यातील २९२० जण उत्तीर्ण झाले. यात १४४५ मुले तर १४७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे ८७.२० तर मुलींचे ९५.६५ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. एकूण ९१.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सर्वांत मागे हिंगोली तालुकाहिंगोली तालुक्यात नोंदणीकृत ४०८५ पैकी ३९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३५७६ जण उत्तीर्ण झाले. यातील १८३३ मुले तर १७४३ मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५३ तर मुलांचे ९४.०१ टक्के आहे.

४५६२ मुले विशेष प्राविण्यातहिंगोली जिल्ह्यातील नियमितच्या १५ हजार ९७९ पैकी १५७८९ जणांनी परीक्षा दिली. यातील ४५६२ विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले. ५१३२ मुले प्रथम श्रेणीत, ३८११ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर १०५६ काठावर पास झाले. रीपीटरमध्ये २६ पैकी ५ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय श्रेणीत तर ७ फक्त उत्तीर्ण झाले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालHingoliहिंगोली