शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

By विजय पाटील | Updated: May 27, 2024 15:55 IST

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.६१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत १६ हजार ३०० पैकी १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीतही मुलींनीच बाजी मारली.

हिंगोली जिल्हा औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेवटच्या स्थानी दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ८ हजार ६२८ मुले तर ७ हजार ६७२ मुली परीक्षेला बसले होते. यापैकी ८५१५ मुले तर ७५७९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. एकूण १६ हजार ९४ जणांनी परीक्षा दिली. यातील ७ हजार ४९७ मुले तर ७ हजार २४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.०४ टक्के तरी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६१ टक्के आहे. एकूण ९१.६१ टक्के निकाल लागला आहे.

नियमित परीक्षा १५ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली. नियमितचा निकाल ९२.२२ टक्के लागला आहे. तर रिपीटर्सची ३२१ पैकी ३०५ जणांनी परीक्षा दिली. यात १८३ जण उत्तीर्ण झाली. यात ६० टक्के निकाल लागला आहे.

वसमतचा सर्वाधिक ९४.२६ टक्क्यांवरवसमत तालुक्यातून ४३०६ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ४२९१ जणांनी परीक्षा दिली. यात २१५८ मुले तर १८८७ मुली उत्तीर्ण झाल्या. ४०४५ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.०२ तर मुलींचे ९६.९६ टक्के आहे. एकूण निकाल ९४.२६ टक्के आहे.

सेनगाव, औंढा ९३ टक्क्यांवरसेनगाव तालुक्यात २३४१ जणांनी नोंदणी केली. तर २२९२ जणांनी परीक्षा दिली. यातील २१४५ उत्तीर्ण झाले. यात ११३८ मुले तर १००७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५३ तर मुलींचे तब्बल ९७.२९ टक्के आहे. औंढा तालुक्यात नोंदणीकृत २०२३ पैकी २०१० जणांनी परीक्षा दिली. १८७५ जण उत्तीर्ण झाले.यात ७९७ तर मुली १०७८ उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७५ तर मुलींचे ९६.०७ टक्के आहे.

कळमनुरीत ९१.२७ टक्केकळमनुरी तालुक्यात नोंदणीकृत ३२२४ पैकी ३१९९ जण परीक्षेला बसले. यातील २९२० जण उत्तीर्ण झाले. यात १४४५ मुले तर १४७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे ८७.२० तर मुलींचे ९५.६५ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. एकूण ९१.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सर्वांत मागे हिंगोली तालुकाहिंगोली तालुक्यात नोंदणीकृत ४०८५ पैकी ३९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३५७६ जण उत्तीर्ण झाले. यातील १८३३ मुले तर १७४३ मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५३ तर मुलांचे ९४.०१ टक्के आहे.

४५६२ मुले विशेष प्राविण्यातहिंगोली जिल्ह्यातील नियमितच्या १५ हजार ९७९ पैकी १५७८९ जणांनी परीक्षा दिली. यातील ४५६२ विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले. ५१३२ मुले प्रथम श्रेणीत, ३८११ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर १०५६ काठावर पास झाले. रीपीटरमध्ये २६ पैकी ५ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय श्रेणीत तर ७ फक्त उत्तीर्ण झाले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालHingoliहिंगोली