शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी?

By विजय पाटील | Updated: April 1, 2024 14:17 IST

महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

हिंगोली : भाजपनेच मागील काही दिवसांपासून चर्चेचा रतीब लावत शिंदे गटाची जागा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देवून भाजपला तोंडघशी पाडण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत शिंदे गट आहे. उमेदवारीचे हे नाट्य मात्र भाजपच्या तीन आमदारांना जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोलीतील भाजपचे नेते जेमतेम पाचशे कार्यकर्ते जमा करून शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना प्रचंड विरोध असल्याचे दाखविण्यात यशस्वी ठरले. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उघड भूमिका घेवून राजीनामा दिल्याने ते भाजप श्रेष्ठींच्या डोळ्यात सलत होते. एवढेच काय तर त्यांनी दिल्लीत उपोषणही केले. त्यामुळे आधीच त्यांच्या नावाला विरोध केला जात होता. मात्र तो डावलून मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुन्हा भाजपच्या स्थानिक मंडळीने पाटील यांना विरोध असल्याचे सांगून उमेदवार बदला अथवा आम्हाला उमेदवारी द्या, अशी भूमिका घेतली होती. 

शिंदे गटाकडे दुसरा तेवढा सक्षम उमेदवार दिसत नसल्याने त्याांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झाले उलटच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नीसाठी यवतमाळमधील जागा देवू करीत हदगाव विधानसभेत मागच्या वेळी अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बाबूराव कदम यांना पुढे केले. कदम यांच्यामुळेच आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मानहानीकारक पराभव पत्करण्याची नामुष्की आली होती. पुन्हा तेच कदम आष्टीकरांच्या पुढ्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या मंडळींनाही आता उमेदवार बदलला तर नेटाने काम करून भाजपचे म्हणने खरे होते, हे पटवून द्यावे लागणार आहे. जर कदम यांना दगाफटका झाला तर आ.तान्हाजी मुटकुळे, आ.नामदेव ससाणे व आ.भीमराव केराम यांची पुढची विधानसभेची उमेदवारीच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मंडळीची काम करण्याची इच्छा नसल्याने आधी यांना तंबी द्या, अशी अटच शिंदे गटाने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या या नाट्यात हाती काही लागले नसताना तीन आमदारांची विधानसभा मात्र पणाला लागली आहे. भाजपच्या रेट्यापुढे लोकसभेचा उमेदवार बदलू शकतो. तर भाजप आपलेच आमदार बाजूला सारून नवे चेहरे देण्यात तसूभरही मागे पाहणार नसल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

महाविकास आघाडीला फायदा घेता येणार?महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेही आता शिंदे गटाने भाजपवरची आपल्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.उमेदवार बदलल्याचा फायदा त्याशिवाय मात्र घेता येणार नाही.

...तर भाजप आमदारांनाही बसू शकतो फटकाउमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपच्या तीन आमदारांनी केलेल्या विरोधाचा फटका त्यांना आगामी विधानसभेतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या आमदारांचे मागील काही दिवसांत शिंदे गटाशी सख्य उरले नाही. उमेरखेडमध्ये खा. पाटील यांचे कारखान्याच्या रुपाने नेटवर्क आहे. तर मागील पाच वर्षांत खा. पाटील यांनी किनवटकडे सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे खा.पाटील यांना विरोध करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले भाजपचे हे तीन आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापैकी कुणीही फार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, असे नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा