शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी?

By विजय पाटील | Updated: April 1, 2024 14:17 IST

महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

हिंगोली : भाजपनेच मागील काही दिवसांपासून चर्चेचा रतीब लावत शिंदे गटाची जागा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देवून भाजपला तोंडघशी पाडण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत शिंदे गट आहे. उमेदवारीचे हे नाट्य मात्र भाजपच्या तीन आमदारांना जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोलीतील भाजपचे नेते जेमतेम पाचशे कार्यकर्ते जमा करून शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना प्रचंड विरोध असल्याचे दाखविण्यात यशस्वी ठरले. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उघड भूमिका घेवून राजीनामा दिल्याने ते भाजप श्रेष्ठींच्या डोळ्यात सलत होते. एवढेच काय तर त्यांनी दिल्लीत उपोषणही केले. त्यामुळे आधीच त्यांच्या नावाला विरोध केला जात होता. मात्र तो डावलून मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुन्हा भाजपच्या स्थानिक मंडळीने पाटील यांना विरोध असल्याचे सांगून उमेदवार बदला अथवा आम्हाला उमेदवारी द्या, अशी भूमिका घेतली होती. 

शिंदे गटाकडे दुसरा तेवढा सक्षम उमेदवार दिसत नसल्याने त्याांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झाले उलटच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नीसाठी यवतमाळमधील जागा देवू करीत हदगाव विधानसभेत मागच्या वेळी अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बाबूराव कदम यांना पुढे केले. कदम यांच्यामुळेच आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मानहानीकारक पराभव पत्करण्याची नामुष्की आली होती. पुन्हा तेच कदम आष्टीकरांच्या पुढ्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या मंडळींनाही आता उमेदवार बदलला तर नेटाने काम करून भाजपचे म्हणने खरे होते, हे पटवून द्यावे लागणार आहे. जर कदम यांना दगाफटका झाला तर आ.तान्हाजी मुटकुळे, आ.नामदेव ससाणे व आ.भीमराव केराम यांची पुढची विधानसभेची उमेदवारीच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मंडळीची काम करण्याची इच्छा नसल्याने आधी यांना तंबी द्या, अशी अटच शिंदे गटाने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या या नाट्यात हाती काही लागले नसताना तीन आमदारांची विधानसभा मात्र पणाला लागली आहे. भाजपच्या रेट्यापुढे लोकसभेचा उमेदवार बदलू शकतो. तर भाजप आपलेच आमदार बाजूला सारून नवे चेहरे देण्यात तसूभरही मागे पाहणार नसल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

महाविकास आघाडीला फायदा घेता येणार?महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेही आता शिंदे गटाने भाजपवरची आपल्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.उमेदवार बदलल्याचा फायदा त्याशिवाय मात्र घेता येणार नाही.

...तर भाजप आमदारांनाही बसू शकतो फटकाउमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपच्या तीन आमदारांनी केलेल्या विरोधाचा फटका त्यांना आगामी विधानसभेतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या आमदारांचे मागील काही दिवसांत शिंदे गटाशी सख्य उरले नाही. उमेरखेडमध्ये खा. पाटील यांचे कारखान्याच्या रुपाने नेटवर्क आहे. तर मागील पाच वर्षांत खा. पाटील यांनी किनवटकडे सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे खा.पाटील यांना विरोध करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले भाजपचे हे तीन आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापैकी कुणीही फार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, असे नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा