शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मोठी बातमी: हिंगोलीत लोकसभेचा उमेदवार बदलून शिंदे गट करणार भाजपची कोंडी?

By विजय पाटील | Updated: April 1, 2024 14:17 IST

महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

हिंगोली : भाजपनेच मागील काही दिवसांपासून चर्चेचा रतीब लावत शिंदे गटाची जागा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देवून भाजपला तोंडघशी पाडण्याचा डाव टाकण्याच्या तयारीत शिंदे गट आहे. उमेदवारीचे हे नाट्य मात्र भाजपच्या तीन आमदारांना जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोलीतील भाजपचे नेते जेमतेम पाचशे कार्यकर्ते जमा करून शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना प्रचंड विरोध असल्याचे दाखविण्यात यशस्वी ठरले. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उघड भूमिका घेवून राजीनामा दिल्याने ते भाजप श्रेष्ठींच्या डोळ्यात सलत होते. एवढेच काय तर त्यांनी दिल्लीत उपोषणही केले. त्यामुळे आधीच त्यांच्या नावाला विरोध केला जात होता. मात्र तो डावलून मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहास्तव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पुन्हा भाजपच्या स्थानिक मंडळीने पाटील यांना विरोध असल्याचे सांगून उमेदवार बदला अथवा आम्हाला उमेदवारी द्या, अशी भूमिका घेतली होती. 

शिंदे गटाकडे दुसरा तेवढा सक्षम उमेदवार दिसत नसल्याने त्याांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र झाले उलटच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नीसाठी यवतमाळमधील जागा देवू करीत हदगाव विधानसभेत मागच्या वेळी अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बाबूराव कदम यांना पुढे केले. कदम यांच्यामुळेच आष्टीकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मानहानीकारक पराभव पत्करण्याची नामुष्की आली होती. पुन्हा तेच कदम आष्टीकरांच्या पुढ्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या मंडळींनाही आता उमेदवार बदलला तर नेटाने काम करून भाजपचे म्हणने खरे होते, हे पटवून द्यावे लागणार आहे. जर कदम यांना दगाफटका झाला तर आ.तान्हाजी मुटकुळे, आ.नामदेव ससाणे व आ.भीमराव केराम यांची पुढची विधानसभेची उमेदवारीच धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मंडळीची काम करण्याची इच्छा नसल्याने आधी यांना तंबी द्या, अशी अटच शिंदे गटाने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या या नाट्यात हाती काही लागले नसताना तीन आमदारांची विधानसभा मात्र पणाला लागली आहे. भाजपच्या रेट्यापुढे लोकसभेचा उमेदवार बदलू शकतो. तर भाजप आपलेच आमदार बाजूला सारून नवे चेहरे देण्यात तसूभरही मागे पाहणार नसल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

महाविकास आघाडीला फायदा घेता येणार?महायुतीमध्ये घडलेल्या या घडामोडींचा महाविकास आघाडी कसा फायदा घेणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेही आता शिंदे गटाने भाजपवरची आपल्या उमेदवाराची जबाबदारी टाकल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही एकजूट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.उमेदवार बदलल्याचा फायदा त्याशिवाय मात्र घेता येणार नाही.

...तर भाजप आमदारांनाही बसू शकतो फटकाउमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपच्या तीन आमदारांनी केलेल्या विरोधाचा फटका त्यांना आगामी विधानसभेतही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या आमदारांचे मागील काही दिवसांत शिंदे गटाशी सख्य उरले नाही. उमेरखेडमध्ये खा. पाटील यांचे कारखान्याच्या रुपाने नेटवर्क आहे. तर मागील पाच वर्षांत खा. पाटील यांनी किनवटकडे सर्वाधिक लक्ष दिले होते. त्यामुळे खा.पाटील यांना विरोध करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले भाजपचे हे तीन आमदार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेही यापैकी कुणीही फार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, असे नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा