शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते," उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर उपरे नाचतायत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

"डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय. हे नुसते हवेत थापांच्या वाफा सोडतायत. सरकार आपल्या दारी मात्र योजना कागदावरी असं सुरुये. मी मागेही बोललो होतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे. भाजपमध्ये जे चाललंय सगळं चाललंय ते म्हणजे सगळं आयाराम," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिगोलीत आयोजित सभेत त्यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.

मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. अनेक वर्ष आपण युतीत होतो, अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष वाढीसाठी आयुष्य झिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल वाटायचं, पण हे राहिले दांड्यापुरते. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर हे उपरे नाचतायत. एवढ्यासाठी भाजप वाढवायला मेहनती केली का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आजही त्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांबद्दल दया असल्याचं ते म्हणाले.

अजून किती डबे लागणार?"डबल इंजिन सरकारला आता अजित दादांचा आणखी एक डबा लागलाय. अजून किती डबे लागणार, मालगाडीच होतेय. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करायचं कर्तुत्व नाही का? तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का?" असंही ते म्हणाले.

टरबूजालाही पाणी द्यावं लागतं'एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाHingoliहिंगोली