शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते," उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 16:48 IST

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर उपरे नाचतायत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.

"डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय. हे नुसते हवेत थापांच्या वाफा सोडतायत. सरकार आपल्या दारी मात्र योजना कागदावरी असं सुरुये. मी मागेही बोललो होतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे. भाजपमध्ये जे चाललंय सगळं चाललंय ते म्हणजे सगळं आयाराम," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. हिगोलीत आयोजित सभेत त्यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.

मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. अनेक वर्ष आपण युतीत होतो, अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष वाढीसाठी आयुष्य झिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल वाटायचं, पण हे राहिले दांड्यापुरते. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पडावं लागतंय आणि त्यावर हे उपरे नाचतायत. एवढ्यासाठी भाजप वाढवायला मेहनती केली का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आजही त्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांबद्दल दया असल्याचं ते म्हणाले.

अजून किती डबे लागणार?"डबल इंजिन सरकारला आता अजित दादांचा आणखी एक डबा लागलाय. अजून किती डबे लागणार, मालगाडीच होतेय. तुमच्या पक्षात चांगले नेते तयार करायचं कर्तुत्व नाही का? तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का?" असंही ते म्हणाले.

टरबूजालाही पाणी द्यावं लागतं'एकीकडे राज्यात दुष्काळ पडलाय आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. फडणवीस यांना मी बोलणं सोडलं आहे. मागे मी त्यांना कलंक बोललो होतो, त्यांना फडतूस बोललो, तर बोबाटा झाला होता. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही. अरे टरबूजालाही पाणी द्यावं लागतं', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाHingoliहिंगोली