शशिकांत वडकुते राज्य उपाध्यक्षपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:04+5:302021-02-07T04:28:04+5:30
बांधकाम साहित्य रस्त्यावर हिंगोली : शहरात अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करताना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. ...

शशिकांत वडकुते राज्य उपाध्यक्षपदी
बांधकाम साहित्य रस्त्यावर
हिंगोली : शहरात अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करताना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्यानंतर काही नागरिक अनेक दिवस बांधकाम सुरू करीत नाहीत. त्यामुळे बांधकाम साहित्य तसेच रस्त्यावर पडून राहत आहे. यावरून दुचाकी वाहन गेल्यास वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे लक्ष देऊन बांधकाम साहित्य रस्त्यावर अनेक दिवस ठेवणाऱ्या नागरिकांवर कारावाई करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातून धावताहेत जड वाहने
हिंगोली : नांदेड व अकोलाकडून येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी शहराच्या बाहेरून वळण रस्ता काढून दिला आहे. शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील जड वाहनांची वर्दळ कमी व्हावी, हा उद्देश त्यामागे होता. मात्र काही दिवसांपासून जड साहित्याची वाहतूक करणारी वाहने शहरातून जाणाऱ्या मार्गावरून धावत आहेत. या मार्गावर अगोदरच वाहनांची वर्दळ असते. त्यात जड वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जड वाहनांना वळण रस्त्यावने काढून द्यावे, अशी मागणी होत आहे.
रेल्वेस्थानक निर्मनुष्य
हिंगोली: येथून अकोला व पूर्णा मार्गावर रेल्वे धावतात. सध्या कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली असली तरी प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे. केवळ लांब पल्ल्याच्या रेल्वे धावत आहेत. त्यात प्रवासी रिझर्वेशन करीत असल्याने रेल्वे येण्याच्या अगोदर काही मिनिटे येत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक सामसूम दिसून येत आहे. शनिवारी रेल्वे कर्मचाऱ्याशिवाय इतर प्रवासी दिसून आले नाहीत.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक
हिंगोली: शहरातून नांदेड, परभणी, वाशिम आदी मार्गावर खासगी प्रवासी वाहने धावतात. एसटी बस प्रवाशांसाठी कमी पडत असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी प्रवासी वाहनांकडे आहे. मात्र खासगी वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवित आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हायमास्ट दिवे बसविण्याची मागणी
हिंगोली : शहरातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. मात्र जुन्या नागरी वस्तीतील काही भागात अद्यापही हायमास्ट दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी चालताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या भागातही सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.