शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

दहा पैकी सातजणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

हिंगोली : आज प्रत्येकाकडे मोबाईल आल्याने एका क्षणात सर्व माहिती मिळत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली ...

हिंगोली : आज प्रत्येकाकडे मोबाईल आल्याने एका क्षणात सर्व माहिती मिळत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची कलाच विसरली जात आहे. शहरातील दहाजणांपैकी सातजणांना पत्नीचा मोबाईल नंबरही पाठ नसल्याने स्पष्ट झाले.

एकापेक्षा एक सरस मोबाईल आल्याने मोबाईलची साठवण क्षमताही अनेक पटीने वाढली आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्याच लोकांकडे मोबाईल असायचे. त्यामुळे नंबर सहज पाठ होत असत. आता मात्र एका मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वत:च्या मोबाईल नंबरशिवाय इतरांचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्नही केला जात नाही. विशेष म्हणजे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे समोर आले आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक भागात गुरुवारी दहाजणांना त्यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर लक्षात आहे का याची विचारणा केली असता दहा पैकी सातजणांनी पत्नीचा मोबाईल नंबरच लक्षात नसल्याचे सांगितले. मोबाईल फोनमध्ये एकदा नंबर सेव्ह केल्यानंतर पुन्हा नंबर पाहण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमत @ गांधी चौक

अ - अ व्यक्तीला पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सुरुवातीचे चार अंक सांगता आले, तर इतर अंक सांगता आले नाही.

ब - ब व्यक्तीला स्वत:चा नंबर सांगता आला. मात्र, पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नसल्याचे त्याने सांगितले.

क - या व्यक्तीने पत्नीकडे असलेल्या मोबाईल नंबरचे सुरुवातीचे दोन व शेवटचे चार अंक सांगितले. इतर अंक सांगताना मात्र अडखळत होता.

ड - या व्यक्तीने घरात एकच मोबाईल असल्याचे सांगितले. त्यामुळे हा नंबर सर्वांनाच पाठ असल्याचा दावाही त्याने केला.

ई- या व्यक्तीकडे असलेल्या दोन मोबाईल नंबरपैकी एकच नंबर पाठ होता. तसेच घरी सर्वांसाठी असलेल्या मोबाईलचा नंबर मात्र पाठ नव्हता.

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

आता सर्वांकडेच स्मार्ट फोन असल्याने जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहत आहेत. फोनमध्ये नंबर सेव्ह केला जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कुणी लक्षच देत नाही. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच आपला मोबाईल नंबर सोडून इतरांचा नंबर लक्षात राहत नाही. गुरुवारी एकास स्वत:चा सोडून इतर कोणता नंबर पाठ आहे, असे विचारले असता त्याच्या बॉसचा नंबर लक्षात असल्याचे त्याने सांगितले.

बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना

माझ्याकडे स्मार्ट फोन आहे. माझा नंबर पाठ असला तरी मिस्टरांचा नंबर मात्र पाठ नाही. मोबाईलमध्ये नंबर सेव्ह असल्याने पाठ करण्याची आवश्यकताच भासली नाही.

- एक गृहणी

मागील दोन वर्षांपासून मोबाईल वापरते. तसेच मिस्टरांकडे व मुलांकडेही मोबाईल आहे. परंतु, त्यापैकी एकाचाही नंबर पाठ नाही. मोबाईलमध्ये नाव टाकल्यास लगेच फोन लावता येतो. नंबर लक्षात ठेवण्याची गरजच नाही.

- एक गृहिणी

लहान मुलांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ

शाळेत आई-बाबा दोघांचाही नंबर दिला आहे. तसेच शाळेच्या डायरीवर नंबर लिहून ठेवला होता. त्यामुळे दोघांचेही नंबर पाठ केले. आता शाळा सुरू नसल्या तरी नंबर मात्र पाठ आहे.

- शर्वरी कावरखे

माझ्याकडे मोबाईल नाही. बाबांना सारखा फोन लावावा लागतो. त्यामुळे बाबांचा मोबाईल नंबर पाठ झाला. तसेच अंकलचा नंबरही पाठ आहे.

-पीयूष भालेराव

व्यसनाधीनता, मानसिक आजार, फिटचा आजार, आदींमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच ६० वर्षांनंतर काही गोष्टी लक्षात राहत नाहीत.

- डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली