शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ट्रॅक्टर थुंकल्याने राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी

By विजय पाटील | Updated: April 20, 2023 15:23 IST

दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कवठा येथे ट्रॅक्टरच्या पंजीवर थुंकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास घडली.

यात पहिल्या गटाच्या तक्रारीनुसार कवठा येथे २० एप्रिल रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी रामदास प्रल्हाद बांगर यांचा पुतण्या परमेश्वर रमेश बांगर हा घरासमोर ब्रश करीत होता. तो थुंकल्याने पाणी बालाजी भगवान बांगर याच्या ट्रॅक्टरवर पडले. त्यामुळे बालाजीने लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर, पाठीत मारून जखमी केले. तर भगवान आत्माराम बांगर, कृष्णा भगवाना बांगर, आकाश भगवान बांगर या तिघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले.

तर दुसऱ्या गटाचे बालाजी भगवान बांगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ज्ञानेश्वर रमेश बांगर हा ब्रश करीत असताना ट्रॅक्टरच्या पंजीवर थुंकला. तेव्हा त्यास थुंकू नको म्हणताच त्याने शिवीगाळ केली. तर किशोर रमेश बांगर याने दगड हातात घेवून कानाजवळ, पाठीत मारून जखमी केले. तर परमेश्वर रमेश बांगर, रामदास प्रल्हाद बांगर या दोघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बालाजीसह त्याच्या वडिलास व भावासह दगडाने पाठीत, डोक्यात मारहाण करून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली