शिष्यवृत्तीची परीक्षा होतेे; मग शाळेची का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:27+5:302021-04-12T04:27:27+5:30
एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ...

शिष्यवृत्तीची परीक्षा होतेे; मग शाळेची का नाही?
एकविसाव्या शतकातील कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे हे योग्य नसल्याचे उपक्रमशील शिक्षक देवीदास गुंजकर यांनी सांगितले
एरवीही मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळांकडून वर्षभर केले जाते. अंतिम परीक्षांतही त्याच प्रमाणात गुण असतात. मात्र, ऑनलाईन परीक्षा घेणेही सर्व शाळांना शक्य होईल, असे वाटत नाही. त्यासाठीचे साहित्य सर्वांकडे राहील, हे सांगता येत नाही. परीक्षा घेतल्या पाहिजे मात्र तांत्रिक उपलब्धतेचे काय? अशी प्रतिक्रिया माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.
मुलांसाठी परीक्षा आवश्यक आहेत. त्याचआधारे त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा, हे आमचे म्हणणे आहे. यासाठी उत्तरपत्रिका घरी पाठवून ऑनलाईन पेपर देऊन ठराविक वेळेत शाळेत आणून पालकांनी जमा केल्यास व कोरोनाचे सर्व नियम पाळून गर्दी न करता या उत्तरपत्रिका सादर केल्यास शक्य आहे, असे शिक्षण संस्थाचालक दिलीप बांगर म्हणाले.
सध्याच्या कोरोनाच्या काळात परीक्षेला मुलांना पाठविणे अवघड आहे तर ऑनलाईन परीक्षा सर्वच शाळा घेतील, असे नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घेतली तर चांगलेच आहे. त्यामुळे पालकांना मुलाची गुणवत्ता कळेल.
-दिनकर पिसे, पालक
विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा बोनस न देता ऑनलाईन पद्धतीने काही ना काही परीक्षा घेतली पाहिजे. त्यामुळे निदान मुले अभ्यास तरी करतील. सध्या ऑनलाईन अभ्यासात मुले काय करताहेत हे आधीच कळायला मार्ग नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन शक्य नसल्या तरीही ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात.
-अजय बियाणी, पालक
पहिली २२८५२
दुसरी २३१८७
तिसरी २२१९२
चौथी २१८७४
पाचवी २१३४२
सहावी २०७४०
आठवी २०५३५
नववी १९५१९
अकरावी१२६५७
सर्वाधिक मुले दुसरीत २३१८७
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी२०५८५२