महाविद्यालयांतच अडकले १०३२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:49+5:302021-03-23T04:31:49+5:30
हिंगोली जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या ५०११ विद्यार्थ्यांनी गतवर्षी नोंदणी केली होती. यापैकी ४१३९ जणांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांनी मंजूर केली होती. यंदा ...

महाविद्यालयांतच अडकले १०३२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज
हिंगोली जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या ५०११ विद्यार्थ्यांनी गतवर्षी नोंदणी केली होती. यापैकी ४१३९ जणांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांनी मंजूर केली होती. यंदा मात्र ३७३३ जणांचेच अर्ज आतापर्यंत आले आहेत. यापैकी ९०० अर्ज महाविद्यालय, तर १९० अर्ज समाजकल्याणच्या स्तरावर प्रलंबित आहेत. इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्गातील ४०१७ जणांना गतवर्षी शिष्यवृत्ती मिळाली होती. यंदा यातही ३३८१ अर्ज आले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील मिळून हजारावर अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित आहेत. जिल्हाधिकऱ्यांच्या स्वाक्षरीच्या नोटिसा देऊनही अनेक महाविद्यालये यात गंभीर नाहीत.
जिल्ह्यातील महाविद्यालये १५२
एकूण प्रलंबित अर्ज १०३२
इतर मागास, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग ६२६
अनुसूचित जाती प्रवर्ग ४०६
तर महाविद्यालयांवर कारवाई
याबाबत सहायक समाजकल्याण आयुक्त शिवानंद निमगिरे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची पत्रे देऊन महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे अर्ज मुलांकडून भरून घेण्यास सांगितले होते. तरीही ते प्रलंबित आहेत. आणखी दोन दिवसांत ऑनलाईन अर्ज केला तर या मुलांना शिष्यवृत्ती देता येईल. यासाठी महाविद्यालयांनी कॅम्प लावावेत. विद्यार्थी वंचित राहिल्यास महाविद्यालयांवर कारवाई होईल.