शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सावित्रींच्या लेकींची शाळेसाठी जीवघेणी कसरत; गुढघाभर पाण्यातून रोजच करावं लागतो प्रवास

By रमेश वाबळे | Updated: July 18, 2023 19:00 IST

हिंगोली तालुक्यातील कोथळज ते समगा जाणाऱ्या रस्त्याची अंत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर सध्या एक ते तीन फुटापर्यंत पाणी साचत आहे.

हिंगोली : गाव तेथे शाळा व गाव तेथे रस्ता, हे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. परंतु, या धोरणाची अंमलबजावणी ना लोकप्रतिनिधी करतात, ना प्रशासन याकडे गांर्भियाने पाहते. त्यामुळे याचा त्रास ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतो. हिंगोली तालुक्यातील कोथळज ते समगा जाणाऱ्या रस्त्याची अंत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर सध्या एक ते तीन फुटापर्यंत पाणी साचत आहे. या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना मार्ग काढत समगा येथील शाळा गाठावी लागत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यात पडल्यामुळे एका विद्यार्थिनीचा हात फॅक्चर झाला.

हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील शंभरावर विद्यार्थी- विद्यार्थिनी गावात सातवीनंतर वर्ग नसल्याने समगा येथील शाळेत ज्ञानार्जनासाठी ये- जा करतात. सुमारे अडिच कि.मी.अंतर पार करीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. परंतु, यातील जवळपास एक कि.मी.रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला भराव टाकल्यामुळे रस्ता खोल पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सुमारे एक ते तीन फुटापर्यंत पाणी साचत आहे. तसेच चिखलही निर्माण झाला आहे. पाणी आणि चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने विद्यार्थी अडखळून पडत आहेत.दोन दिवसांपूर्वीच इयत्ता आठवीची विद्यार्थीनी दिव्या बालाजी घुगे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डा दिसला नसल्यामुळे पडली. यात तिचा हात फॅक्चर झाला आहे.

दरम्यान, दोन ते अडिच किमीच्या या रस्त्याचे काम मध्यंतरी सुरू करण्यात आले होते. एक ते दीड किमीचे कामही कामही झाले. परंतु, उर्वरित काम मात्र अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना साचलेले पाणी आणि चिखलातून वाट काढावी लागत आहे.

पाल्यांना जीव मुठीत धरून गाठावी लागते शाळा...कोथळज येथील सुमारे शंभरावर विद्यार्थी समगा येथील शाळेत जातात. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठीच्या एक ते दिड किमी रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. सध्या या रस्त्यावर एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.- राहुल घुगे, पालक, कोथळज

प्रशासनाला भिती कोणाची वाटते?...कोथळज ते समगा हा रस्ता सार्वजनिक असतानाही अर्धाभाग चांगला तर अर्धाभाग हा खड्डेमय करून सोडला आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला याबाबत कळविले. परंतु,गत वर्षापासून या रस्त्याकडे कोणी पहायलाही तयार नाही. आज अशी परिस्थिती आहे की वाहने तर सोडा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी शाळेत जाताना एक ते तीन फुट पाणी, चिखलातून वाट काढावी लागत आहे.- पंडीत घुगे, पालक, कोथळज

टॅग्स :SchoolशाळाHingoliहिंगोलीEducationशिक्षण