शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'गावगुंडांपासून वाचवा अन्यथा आमचे स्थलांतर करा'; बोरीशिकारी ग्रामस्थांची प्रशासनास आर्त हाक 

By विजय पाटील | Updated: February 6, 2024 16:14 IST

बोरीशिकारी येथील गावगुंड व त्याचे टोळके ग्रामस्थांना धमकावून त्यांना वारंवार मारहाण करीत आहे.

हिंगोली : तालुक्यातील बोरीशिकारी येथे वाळू, मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या एका गावगुंडाने ग्रामस्थांना जेरीस आणले असून जिवघेणा हल्ला करून मारण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामस्थांचे जगणे मुश्किल करणाऱ्या या गुंडाला चाप बसवा अन्यथा आम्हाला बाहेरगावी जागा द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

या गावगुंडाच्या त्रासाला वैतागून ६ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, बोरीशिकारी येथील हा गावगुंड व त्याचे टोळके ग्रामस्थांना धमकावून त्यांना वारंवार मारहाण करीत आहे. तो त्याच्या शेतातील वाळू, मुरुम आदीचे अवैध उत्खनन करून भरधाव वेगाने वाहन गावातून नेतो. लहान मुलांना रस्त्यावर खेळणे अवघड झाले. याबाबत कोणी काही बोलले तर त्याच्यावर दहशत निर्माण केली जात आहे. कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर जीवघेणा हल्ला करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

या गावगुंडासह त्याच्या साथीदारावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही त्याच्यावर कुणाचा काहीच धाक नाही. ३१ जानेवारी २०२४ रोजी गावातील विलास व नामदेव बेंगाळ यांना कोणतेही कारण नसताना कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तर हे गावगुंड इतर युवकांनाही अवैध धंद्यांमध्ये उतरवत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन