शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मराठवाड्याचे गांधी गेले; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 3:54 PM

सर्वोदय चळवळ आतापर्यंत जिवंत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

वसमत (हिंगोली) : मराठवाड्याचे गांधी म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनानी, सर्वोदयी विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल (९८) यांचे आज  निधन झाले. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ते बिनीचे शिलेदार होते. निजामाशी कडवी झुंज देणाऱ्या गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी आयुष्यात कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. 

नांदेड येथे त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना वसमत येथे आणण्यात आले होते. वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेरीस आज दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. वसमत येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वास्तव्यास असलेले गंगाप्रसाद अग्रवाल यांचा जन्म ७ जानेवारी १९२३ मध्ये झाला. अंबेजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात मॅट्रीक तर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयात कॉमर्स इंटरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.

या दरम्यानच १९४२ च्या चले जाव आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्य लढ्यात अग्रवाल यांनी उडी घेतली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. वसमत येथील झेंडा सत्यागृह, आजेगावचा संघर्ष, जंगल सत्यागृह या आंदोलनाचे अग्रवाल यांनी नेतृत्व केले. वसमत तालुक्यातील व हिंगोली- परभणी जिल्ह्यातील सहकारी स्वातंत्र्यसैनिकांसह त्यांनी सशस्त्र लढाईत सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आजेगावचा रणसंग्राम त्यापैकीच एक आहे. या संग्रामात बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते.

मराठवाडा मुक्त झाल्यानंतर गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी महात्मा गांधींच्या विचाराचा प्रचार प्रसाराचा वसा घेतला. स्वदेशी चळवळ स्वावलंबन, सेंद्रीय शेती, खादी ग्रामोद्योगचा प्रचार प्रसार सजीव शेती, राष्ट्रसेवा दलाचे कार्य, भूदान चळवळ, दुष्काळाविरोधातील संघर्ष, शेतकरी स्वावलंबी करण्याची मोहीम, शेतकरी आत्महत्या विरोधातील चळवळ, पाणी आंदोलन आदी समाज सुधारणांच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. १९६२ व १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळी शांती सेनेसाठी कार्य करुन निवार्सितांच्या छावणीमध्ये मदतकार्य करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. १९५३ मध्ये वसमतच्या नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. मात्र राजकारणात त्यांचे मन रमले नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत लढ्यात उडी घेतली. योगाचा प्रचार, प्रसारही त्यांनी केला. निरोगी आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणायचे. गांधींचा विचार आचरणात आणावा, हा त्यांचा आग्रह असायचा. मनगट, मेंदू व मनाचा विकास करणारी शिक्षण पद्धती असावी, ही त्यांची कायम भूमिका राहिली.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांत जागृती अभियान प्रारंभ केले होते. शेती परवडत नसल्याने शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. सेंद्रीय शेतीशिवाय पर्याय नाही. जमिनीचा घसरणारा पोत, त्यामुळे उत्पादनात झालेली घट, त्यातून शेतीचे व शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांच्या सभा शिबीरे त्यांनी देशभर घेतली. तरुण जागृत करण्यावरही त्यांचा भर होता. त्यासाठी तरुणांची संघटना त्यांनी उभी केली. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना समाज सेवेला जोडण्याचे कार्य केले.  

महात्मा गांधी, विनोबा भावे, गोविदभाई श्रॉफ यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव हा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. या शिवाय बाळासाहेब भारदे पुरस्कार, मराठवाडाभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. कधीच भौतिक वादात न अडकता अखंडितपणे समाजसेवा करणारे स्वातंत्र्यसैनानी म्हणून त्यांची कायम ओळख राहणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात व हैद्राबाद मुक्तीसंग्रामात झुंजणाऱ्या गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी मृत्यूशीही कडवी झुंज दिली. मात्र अखेर ९६ व्या वर्षी हा लढवय्या सेनानी मराठवाड्याचा गांधी नावाचा तारा कायमचा निखळला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडा