शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

जलयुक्तला १६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:45 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांची काटेकोर तपासणी चालविली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील कामे घेवून ती थातूर-मातूर पद्धतीने आटोपण्याचा फंडा बंद झाला आहे. यात गतवर्षी अनेक ठिकाणची कामे सुरूच झाली नाही किंवा सुरू झाली तर ती अजून पूर्ण नाहीत. त्यातच वाळूची समस्याही अनेक कामांच्या मुळावर उतरली आहे. कृषी विभागामार्फत होणाऱ्या अनेक कामांत कंत्राटदारांनी बिलो दराच्या निविदा टाकून पुन्हा कामांना हात न लावल्याचे चित्र आहे. २0१७-१८ मध्ये एकूण २४७७ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी २४६९ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली होती. तर २४३0 कामांची निविदा प्रक्रिया झाली होती. यापैकी २३४0 कामांना कार्यारंभ आदेश दिला होता. यातील १९७५ कामे पूर्ण करून १३.२६ कोटींचा खर्च झाला. यात हिंगोली तालुक्यात २७२ कामांवर १.८४ कोटी, कळमनुरीत ३९८ कामांवर २.७0 कोटी, औंढ्यात ४२५ कामांवर ४.४५ कोटी, सेनगावात ४८५ कामांवर २.५५ कोटी तर वसमतला ३९५ कामांवर १.७२ कोटी खर्ची पडले. याशिवाय २५२ कामे प्रगतीत असून त्यावर ६.१८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यात ढाळीचे बांध १६८, खोल सलग समतल चरग१0१, शेततळे ३८९, वनतळे-२0, मातीनाला बांध ३१, साखळी सिमेंट बंधारे २५, नाला खोलीकरण, सरळीकरण- ३४५, गाळ काढणे- ६८, रिचार्ज शाफ्ट- २५५, ठिबक सिंचन-२३५, तुषार सिंचन ३३५ अशी कामे झाली आहेत. या योजनेत आराखडा ५८ कोटींचा होता. मात्र प्रत्यक्षात ३४ कोटींच्याच निविदा निघाल्या होत्या.१0 गावे वाढली : जुनी कामेही सुरूच२0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ गावे निवडली होती. यात २६७२ कामे प्रस्तावित असून ५१.२१ कोटींचा आराखडा आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने नव्याने १0 गावे वाढविली असून त्यांचेही आराखडे बनविले जाणार आहेत. यात २५६ कामांनाच प्रशासकीय मान्यता मिळाली असून १.२३ कोटींचा खर्च झाला आहे. सध्या जलयुक्त शिवार योजनेत १६ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यात नवीन कामे तर करायचीच आहेत, जुनीही पूर्ण करायची आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई