शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय रुग्णालयात दिव्यांगांची तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST

कोरोनाचा धोका वाढू लागला ; तरी कोणालाही वाटेना कोरोनाची भीती हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना जिल्हा सामान्य ...

कोरोनाचा धोका वाढू लागला ; तरी कोणालाही वाटेना कोरोनाची भीती

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र दिव्यांगांना प्रमाणपत्र देतेवेळेसचे चित्र मात्र पाहण्यासारखेच होते. बुधवारी दिव्यांगांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तोबा गर्दी केली होती. यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

बुधवार हा दिव्यांगांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रमाणपत्र देण्याचा दिवस ठरवून दिला आहे. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. असे असताना मॅनेजमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. परंतु, कोणीच याकडे कसे देत नाही? हा प्रश्न आहे. खरे पाहिले तर ‘एक खिडकी योजना’ यासाठी करायला पाहिजे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रांगेत उभे राहिलेल्या अनेकांना मास्कचे देणेघेणेच नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा तर पार बट्ट्याबोळ उडाला होता. मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र डोके वर काढले आहे. मध्यंतरी चार-पाच महिने दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे बंद केले होते. कोरोना संपला असे गृहीत धरुन जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तीन-चार आठवड्यांपासून दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा बुधवार हा तिसरा होता.

दररोज किती प्रमाणपत्र दिले जातात?

प्रमाणपत्रासाठी कोणालाही परत पाठविले जात नाही. दिवसांतून जवळपास १०० प्रमाणपत्र दिले जातात. प्रमाणपत्र देतेवेळेस सर्व प्रकारची शहानिशा केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. सकाळी दहा ते दुपारी दोन ही वेळ दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठीची राखीव ठेवण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया..........

प्रमाणपत्रासाठी आमची ओढाताण...

बुधवार हा दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा दिवस ठेवला आहे. त्यामुळे बुधवारी कामधंदा सोडून आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयात येतो. परंतु, येथील डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. डॉक्टरांनी दिव्यांगांच्या जीवाशी खेळू नये, हे सांगणे महत्त्वाचे वाटते.

दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लगत आहे. वेळेवर प्रमाणपत्र दिले जात नाही. प्रमाणपत्र देतेवेळेस डॉक्टर मध्येच निघून जातात. काही तर व्हीलचेअरवरील अपंग (दिव्यांग) आहेत. दिव्यांग असल्याने ‘सीएस’ साहेबांकडे जाता येत नाही. डॉक्टरांनी दिव्यांगांसाठी वेळ काढणे गरजेचे आहे.

अपंग प्रमाणपत्र कशासाठी ?

शासनाच्या विविध योजनांसाठी अपंग प्रमाणपत्र काढले जाते. अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र असल्याशिवाय शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. याचबरोबर एखादा विद्यार्थी अपंग असेल तर त्यास शैक्षणिक योजनाचा लाभ मिळत नाही. अपंगांना प्रमाणपत्र देण्याचा बुधवार हा ठरवून दिलेला वार आहे. आठवड्यातून दोन वारी अपंगांना प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरुन शासनाच्या योजनांचा लवकर लाभ घेता येईल. प्रमाणपत्र उशिरा मिळते म्हणून लाभ मिळत नाही. परिणामी, अपंग हे शासनाच्या योजनेपासून वंचित राहतात.

अपंग प्रमाणपत्र ठरवून दिलेल्या दिवशीच वेळेवर वाटप केले जात आहे. यात जर कोणी दिरंगाई करत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. कोरोनाकाळात जी गर्दी होत आहे त्यास आळा घातला जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली

फोटो