शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

हिंगोली जिल्ह्यात ५० हजार बेरोजगारांची नोंदणी; अवघ्या १३३८ तरुणांनाच मिळाला रोजगार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 18:56 IST

नवीन रोजगाराची संधी तर सोडा आहे ते रोजगार गेल्याने अनेकजण हैराण

ठळक मुद्दे अनेक अजूनही संधीच्या प्रतीक्षेत कोरोनात रोजगार जाऊनही नोंदणी नाही

हिंगोली : रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे आधीच ४९ हजार २४३ जणांनी रोजगार मिळावा यासाठी नोंदणी केली असताना मार्च ते नोव्हेंबरदरम्यान आणखी १६८४ जणांची यात भर पडली आहे. आता एकूण बेरोजगारांची संख्या ५० हजार ९२७ असून यापैकी १३३८ जणांना मागील सात महिन्यांत रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात २०२० मार्चअखेर ४९ हजार २४३ बेरोजगारांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोना काळात मात्र इतर सर्व विभागांप्रमाणेच या कार्यालयातही नवीन नोंदींची संख्या घटली होती. त्यातच कोरोनामुळे फिरण्यावर बंदी होती. शिवाय अनेक उद्योगही बंद पडले होते. त्यामुळे नवीन रोजगाराची संधी तर सोडा आहे ते रोजगार गेल्याने अनेकजण हैराण होते. त्यामुळे या काळात रोजगारही मिळणे दुरापास्त झाले होते. आऑगस्टमध्ये पहिल्यांदा ३३ जणांना रोजगार मिळाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये तब्बल १२८३ जणांना रोजगाराची संधी मिळाली. या काळात रोजगार मेळावेही प्रत्यक्षात घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून बेरोजगारांना संधी उपलब्ध करून दिली.

रोजगार मेळाव्यांना जेमतेम प्रतिसादजिल्ह्यात यंदा रोजगार मेळाव्यांचे प्रत्यक्ष आयोजन करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आऑनलाइईन मेळाव्यांवर भर देण्यात आला होता. या मेळाव्यांचेही आयोजन सप्टेंबर महिन्यातच सर्वाधिक होते. त्याचा परिणामही चांगला झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील तब्बल १२८३ जणांना रोजगाराची संधी मिळाली. त्यानंतर दिवाळीमुळे पुन्हा हे मेळावे ठप्प झाले होते. आता राज्यस्तरीय मेळावाच होत असून यातही हिंगोली जिल्ह्यासाठी ५३७ जागा उपलब्ध झाल्या आहेत. हा मेळावाही ऑनलाइन आहे. यात ११२२ अर्ज आले आहेत. त्यातील किती जणांना संधी मिळेल, हे आगामी काळात कळणार असून अजून ही प्रक्रिया अंतिम झाली नाही.

यापूर्वीच्याच हजारो जणांनी नोंदणी केली असताना त्यांना कधी रोजगारासाठी स्वयंरोजगार कार्यालयाकडून साधा काॅल येत नाही. त्यामुळे मी बेरोजगार असलो तरीही नोंदणीच्या भानगडीत पडलो नाही. स्वत:च रोजगार शोधतो.- अमोल पाईकराव, बेरोजगार, साळवा

बेरोजगारांना रोजगाराच्या संधींसाठी अनेकदा मेळावे होतात. मात्र बऱ्याचदा त्यात तांत्रिक शिक्षणावर भर दिला जातो. त्यामुळे इतर शाखांच्या तरुणांना फारसा वाव मिळत नाही. तरीही काही तरुणांना मात्र या नोंदणीचा फायदा होतो. - राजू इंगोले, बेरोजगार,जांब

शासनाने विविध प्रकारची भरतीच मागील काही वर्षांपासून बंद केल्यात जमा आहे. शिक्षकांच्या तर जागाच निघत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रयत्न केले तर तेथेही अनंत अडचणी आहेत. नोंदणी करूनही त्याचा काहीच फायदा नाही.- गजानन जगताप, बेरोजगार, हिंगोली

रोजगाराच्या संधीजिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना राज्यस्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी आहेत. यापूर्वीही काही ऑनलाईन मेळावे झाले. त्यात हजारावर तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. याशिवाय काही शासकीय जागांवरही मुलांना संधी मिळाली आहे. बेरोजगार युवकांनी नाेंदणी केल्यास त्यांना याबाबत माहिती देऊन या संधींबाबत अवगत केले जाते. त्यात पुढे त्यांच्या काैशल्यानुरुप रोजगार मिळतो    - पी.एस.खंदारे, रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, हिंगोली

टॅग्स :HingoliहिंगोलीEmployeeकर्मचारी