शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 15:11 IST

जिल्ह्यात मागील पंधरा तासांपासून मुसळधार पावसाची संततधार रविवारीही सुरू आहे.

- रमेश वाबळे

हिंगोली : जिल्ह्यात आठवड्यानंतर शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. बहुतांश भागात पिके पाण्याखाली गेली आहेत. शेकडो घरांसह दुकानांमध्ये पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर हिंगोली शहरात जवळपास दोनशेंहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.

जिल्ह्यात मागील पंधरा तासांपासून मुसळधार पावसाची संततधार रविवारीही सुरू आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीचपाणी झाले असून, हिंगोली शहरातील पेन्शनपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर,  बांगरनगर, जिनमातानगर या भागातील घरांसह दुकानांत पाणी शिरले. यामध्ये संसारोपयोगी वस्तू भिजल्या तर दुकानात पाणी शिरल्यामुळे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. 

नगर पालिका प्रशासनाने या भागातील दोनशेहुन अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अजूनही पाऊस सुरूच असल्याने प्रशासन सतर्क झाले असून, नगर पालिकेच्या पथकाने पाणी साचलेल्या ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने पिके जमिनीसह खरडून गेली आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दरम्यान, पूर परिस्थितीत लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक कृष्णकांत कोकाटे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पडळकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे यांच्यासह पथकाने शहरात पाहणी सुरू केली आहे. पाहणीदरम्यान आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

कयाधू नदीला पूर...हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला असून, या पुराचे पाणी परिसरातील शेतशिवारात घुसरल्याने पिकांसह जमीन खरडली आहे.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोली