शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लसीकरणासाठी रांगच रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:30 AM

हिंगोली : लसीकरण सुरळीत व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली; परंतु चारही केंद्रांवर लसीकरणासाठी ...

हिंगोली : लसीकरण सुरळीत व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली; परंतु चारही केंद्रांवर लसीकरणासाठी रांगच रांग लागलेली पहायला मिळत आहे. दुसरीकडे केंद्रावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे भर उन्हात नागरिकांचा घसा कोरडा पडत आहे.

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या पुढील लोकांना लसीकरण देणे शासनाने सुरू केले आहे. विशेष म्हणजे लसीकरणासाठी युवकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हे पाहून जिल्हा प्रशासनाने शहरात चार केंद्रांची निर्मिती केली आहे, तरीही लसीकरणासाठी रांगच रांग लागत असल्याचे पहायला मिळत आहे. चारही केंद्रांवर लसीकरण व्यवस्थित व्हावे यासाठी गार्डची व्यवस्था केली असली तरी गार्ड मात्र आलेल्या नागरिकांना रांगेत उभे करण्याऐवजी चक्क बाहेर खुर्ची टाकून बसलेले पहायला मिळत आहेत.

सद्य:स्थितीत शहरातील कल्याण मंडपम्‌ येथे २ (पहिला आणि दुसरा मजला), सरजूदेवी विद्यालय येेथे १ आणि माणिक स्मारक आर्य विद्यालय येेथे १ अशी चार केंद्रे निर्माण केली आहेत.

उन्हाचा पारा गत पाच-सहा दिवसांपासून वाढलेला आहे. वाढत्या उन्हामुळे बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. लसीकरण केंद्रावर पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असतानाही पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे अनेक जण घरूनच पाणी आणत आहेत. खरे पाहिले तर चारही केंद्रांवर नगर परिषदेने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी केली आहे.

वाहने अस्ताव्यस्त ; वृद्धांना त्रास

शहरातील कल्याण मंडपम्‌ पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. शहरातील काही लोकांना हे केंद्र जवळचे असल्याने अनेक जण वाहने घेऊन येतात; परंतु अस्ताव्यस्त वाहने उभी करत असल्यामुळे वयोवृद्धांना लसीकरणाच्या ठिकाणी जाताना अतोनात त्रास होत आहे. नगर परिषदेने अग्निशमन विभाग परिसरात वाहने लावण्यासाठी यापूर्वी जाहीर केलेले असतानाही कोणीही त्या ठिकाणी वाहने उभी करत नाहीत. वाहनांची संख्या पाहता या ठिकाणी गार्डची व्यवस्था करणे गरजेचे आहे.