शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

हिंगोली जिल्ह्यात गावोगाव फिरते, बंगाली, चांदसी अथवा इतर अनेक डॉक्टर कोणतीही पदवी नसताना कार्यरत आहेत. मात्र तात्पुरती गरज भागते ...

हिंगोली जिल्ह्यात गावोगाव फिरते, बंगाली, चांदसी अथवा इतर अनेक डॉक्टर कोणतीही पदवी नसताना कार्यरत आहेत. मात्र तात्पुरती गरज भागते म्हणून ग्रामस्थ त्यांची तक्रार करीत नाहीत. त्यामुळे या डॉक्टरांचे फावते. काही ठिकाणी अशा डॉक्टरांच्या तक्रारीही झाल्या. मात्र तेथे जाऊन कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आरोग्य विभाग, महसूल, पोलीस, पं.स. अशा अनेक विभागांचा समावेश आहे. मात्र यातील नेमकी काय जबाबदारी पार पाडायची यावरूनच संभ्रमावस्था असल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांना आपोआपच अभय मिळत आहे. याबाबत प्रशासनाने कोरोना काळात तर ग्रामपंचायतींनाच पत्र देऊन त्यांनीच असा कोणी डॉक्टर असल्यास कळवावे. अथवा त्याला प्रॅक्टिस करू देऊ नये, असे सांगण्यात आले. मात्र गावपातळीवर संबंध जपण्यासाठी अशा कोणी तक्रारीच करीत नाही. आता लोहरा येथील प्रकरणात तर डिग्रीवरच शंका आहे. जर ही डिग्री बोगस असेल तर त्याची पुढील चौकशी करायची कोणी ? हा प्रश्न आहे. काही काळ अजून गेला तर हे प्रकरणही पडद्याआड जाऊ शकते. जिल्ह्यात प्रशासनाने अधिकृतरीत्या जाहीर केलेला बोगस डॉक्टरांचा चार हा आकडा अतिशय हास्यास्पद आहे. यावर प्रशासनाने आणखी काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींवर जबाबदारी सोपवून मोकळे झाल्यास हा प्रकार आणखी फोफावणार असल्याचे दिसते.