शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

१२ कोटींची तूर खरेदी, चुकारे अद्यापही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:57 IST

जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. पहिल्या टप्प्यातील शेतकरी आता चकरा मारून मेटाकुटीला आले आहेत. त्यातच हमीभाव केंद्रांवरील अनियमिततेच्या संकटाने अजून पाठ सोडली नसल्याचे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू आहे. त्यावर नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर खरेदी होत आहे. मात्र कधी-मधी शेतकºयांना मुक्काम करुन तूर विकण्याची वेळ अजून कमी झालेली नाही. तर नाफेडच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना तूर माघारी घेऊन जाण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हिंगोली येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या खरेदी केंद्रावर माळहिवरा येथील एका शेतकरी तूर घेऊन येण्याचा एसएमएस आल्याच्या दुसºया दिवशी म्हणजे २० मार्च रोजी आला तरीही अजून तूर मोजणी झालेली नव्हती. सदर शेतकरी सुधाकर जाधव यांना स्वत:च्या पुतणीच्या साखरपुड्यासही यामुळे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा इशारा देताच नाफेडची यंत्रणा खडबडून जागी झाली व तूर खरेदी केली. कळमनुरीतील प्रकार तर राज्यभर गाजत आहे. तूर खरेदीसाठी शेतकºयाकडून ४0 हजारांची लाच घेतानाच तिघांना पकडले. इतरही केंद्रांवर नाफेडची मंडळी अशीच थोडीबहुत परिस्थिती इतरत्रही आहे. मात्र शेतकºयांना हमीभावासाठी निमूटपणे हे सगळे झेलावे लागत आहे.आतापर्यंत १२.३७ कोटी रुपयांची तूर खरेदी झालेली असली तरीही अजून चुकारे वाटपास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी अनियमिततेमुळे चुकारे लटकले होते. निदान या वेळेस तरी काही गोंधळ होऊ नये याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. मोठ्या पोटतिडकीने शेतकरी चुकाºयांची चौकशी मार्केट कमेटीकडे करीत आहेत. त्या प्रत्येक शेतकºयांना नव- नवीन तारीख सांगून काढून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.शासनाने तूर खरेदीसाठी १९ हजार कोटीला मंजुरी दिली असून, त्यापैकी महाराष्टÑासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे तूर खरेदी झालेल्या शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कागदपत्र बरोबर असणाºया शेतकºयांच्याबँक खात्यावर आॅनलाईन चुकारे जमा होणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक एम. डी. कापुरे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांनी नि:संकोचपणे हमी केंद्रावर तूर विक्री करण्याचेही आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.नाफेडच्या खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीचा गोंधळच सुरु आहे. त्यामुळे तूर विक्रीस घेऊन आलेल्या शेतकºयांना या ठिकाणी मुक्काम टाकण्याची वेळ अजून तरी टळलेली नाही.असे आहे तूर खरेदीचे चित्रहिंगोली जिल्ह्यात २२ हजार ७०२ क्विंंटल तुरीची खरेदी केलेली आहे. यामध्ये हिंगोली येथील खरेदी केंद्रावर २५० शेतकºयांची ३ हजार ४८४ क्विंटल, सेनगाव येथे ४९७ शेतकºयांची ५ हजार ७८८ क्विं, कळमनुरी ६३८ शेतकºयांची ६ हजार ११५ क्विं तर वसमत येथे ३९२ शेतकºयांची २ हजार ७०४ क्विंटल, जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ४९१ शेतकºयांची ४ हजार ६११ क्विंटल अशा एकूण २ हजार २६८ शेतकºयांची २२ हजार ७०२ क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील ६१५८ क्ंिवटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचली तर १६ हजार ५४३ क्विंटल पोहोचणे बाकी आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीMONEYपैसाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र