शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

१२ कोटींची तूर खरेदी, चुकारे अद्यापही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:57 IST

जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. पहिल्या टप्प्यातील शेतकरी आता चकरा मारून मेटाकुटीला आले आहेत. त्यातच हमीभाव केंद्रांवरील अनियमिततेच्या संकटाने अजून पाठ सोडली नसल्याचे चित्र आहे.हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू आहे. त्यावर नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर खरेदी होत आहे. मात्र कधी-मधी शेतकºयांना मुक्काम करुन तूर विकण्याची वेळ अजून कमी झालेली नाही. तर नाफेडच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना तूर माघारी घेऊन जाण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हिंगोली येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या खरेदी केंद्रावर माळहिवरा येथील एका शेतकरी तूर घेऊन येण्याचा एसएमएस आल्याच्या दुसºया दिवशी म्हणजे २० मार्च रोजी आला तरीही अजून तूर मोजणी झालेली नव्हती. सदर शेतकरी सुधाकर जाधव यांना स्वत:च्या पुतणीच्या साखरपुड्यासही यामुळे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा इशारा देताच नाफेडची यंत्रणा खडबडून जागी झाली व तूर खरेदी केली. कळमनुरीतील प्रकार तर राज्यभर गाजत आहे. तूर खरेदीसाठी शेतकºयाकडून ४0 हजारांची लाच घेतानाच तिघांना पकडले. इतरही केंद्रांवर नाफेडची मंडळी अशीच थोडीबहुत परिस्थिती इतरत्रही आहे. मात्र शेतकºयांना हमीभावासाठी निमूटपणे हे सगळे झेलावे लागत आहे.आतापर्यंत १२.३७ कोटी रुपयांची तूर खरेदी झालेली असली तरीही अजून चुकारे वाटपास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी अनियमिततेमुळे चुकारे लटकले होते. निदान या वेळेस तरी काही गोंधळ होऊ नये याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. मोठ्या पोटतिडकीने शेतकरी चुकाºयांची चौकशी मार्केट कमेटीकडे करीत आहेत. त्या प्रत्येक शेतकºयांना नव- नवीन तारीख सांगून काढून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.शासनाने तूर खरेदीसाठी १९ हजार कोटीला मंजुरी दिली असून, त्यापैकी महाराष्टÑासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे तूर खरेदी झालेल्या शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करणे सुरु असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कागदपत्र बरोबर असणाºया शेतकºयांच्याबँक खात्यावर आॅनलाईन चुकारे जमा होणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक एम. डी. कापुरे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकºयांनी नि:संकोचपणे हमी केंद्रावर तूर विक्री करण्याचेही आवाहन नाफेडतर्फे करण्यात आले आहे.नाफेडच्या खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीचा गोंधळच सुरु आहे. त्यामुळे तूर विक्रीस घेऊन आलेल्या शेतकºयांना या ठिकाणी मुक्काम टाकण्याची वेळ अजून तरी टळलेली नाही.असे आहे तूर खरेदीचे चित्रहिंगोली जिल्ह्यात २२ हजार ७०२ क्विंंटल तुरीची खरेदी केलेली आहे. यामध्ये हिंगोली येथील खरेदी केंद्रावर २५० शेतकºयांची ३ हजार ४८४ क्विंटल, सेनगाव येथे ४९७ शेतकºयांची ५ हजार ७८८ क्विं, कळमनुरी ६३८ शेतकºयांची ६ हजार ११५ क्विं तर वसमत येथे ३९२ शेतकºयांची २ हजार ७०४ क्विंटल, जवळा बाजार येथील खरेदी केंद्रावर ४९१ शेतकºयांची ४ हजार ६११ क्विंटल अशा एकूण २ हजार २६८ शेतकºयांची २२ हजार ७०२ क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील ६१५८ क्ंिवटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात पोहोचली तर १६ हजार ५४३ क्विंटल पोहोचणे बाकी आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीMONEYपैसाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र