शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

टंचाईतील प्रस्ताव गेले विभागीय आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:40 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईच्या झळा आता तीव्र होत चालल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईवर फुंकर घालण्यासाठी पुढाऱ्यांना आचारसंहितेचा अडसर आहे. प्रशासनही याच भीतीत असल्याने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईच्या झळा आता तीव्र होत चालल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईवर फुंकर घालण्यासाठी पुढाऱ्यांना आचारसंहितेचा अडसर आहे. प्रशासनही याच भीतीत असल्याने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात अधिग्रहणांची संख्या आता दीडशेवर गेली आहे. टँकरही १८ च्या पुढे सरकले आहेत. मात्र इतर उपाययोजनांचे प्रस्ताव पडताळणी व इतर बाबींमुळे अजूनही मंजुरीच्या टप्प्यात नाहीत. निवडणुकीच्या कामांमुळे अधिकाऱ्यांना यात पडताळणीसाठी वेळ मिळाला नाही. या दरम्यान आचारसंहिता लागली अन् त्यानंतर पडताळणीचे अहवालही आले. जवळपास २१ कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेली आहेत. यात पूरक योजना, नळयोजना दुरुस्ती आदी कामांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. टंचाईसाठी आचारसंहिता शिथिल असल्याचे सांगितले जाते. मात्र तरीही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचा हिरवा कंदिल मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.पूर्वी अशा कामांसाठी गुत्तेदारांची लॉबी सक्रिय असायची. मात्र आता खरोखरच जनता टंचाईत होरपळत आहे.प्रशासनाने केलेल्या पडताळणीतही बºयाच ठिकाणी हे समोर आले आहे. किरकोळ कारणांनी या योजना बंद असल्याने शासनाची कोट्यवधींची इतर यंत्रणा मात्र वाया गेल्यात गणती राहात आहे.वेळेत कामे व्हावीतटंचाईतील कामांना आचारसंहितेचा अडसर नसेल तर पुढील पंधरा दिवसांत याबाबतची सगळी प्रक्रिया पूर्ण करून ही कामे केली तर हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाºया ग्रामस्थांना फायदा होईल. त्यासाठी कडक सूचना देण्यासह दिरंगाईत कारवाई करावी लागणार आहे.टंचाईतील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दरवर्षीच विलंब होतो. त्यामुळे ही कामे करण्यासाठी यंत्रणा जवळपास मे महिन्यात प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुढे नजीकच्या काळात पावसाळा लागणार असल्याने ही कामे करणारी गुत्तेदार मंडळीही विविध कारणे सांगून वेळ मारून नेते. त्यामुळे पुढे पावसाळ्यात टंचाई संपते अन् या मंडळींना योजनेबाबत कोणी विचारतच नाही. त्यामुळे टंचाईतील खर्च नाहक वाया जातो. काही तुरळक ठिकाणीच ही कामे वेळेत करून टंचाईत नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम केले जाते.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीRevenue Departmentमहसूल विभाग