शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईतील प्रस्ताव गेले विभागीय आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:40 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईच्या झळा आता तीव्र होत चालल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईवर फुंकर घालण्यासाठी पुढाऱ्यांना आचारसंहितेचा अडसर आहे. प्रशासनही याच भीतीत असल्याने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईच्या झळा आता तीव्र होत चालल्या आहेत. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत या टंचाईवर फुंकर घालण्यासाठी पुढाऱ्यांना आचारसंहितेचा अडसर आहे. प्रशासनही याच भीतीत असल्याने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यात अधिग्रहणांची संख्या आता दीडशेवर गेली आहे. टँकरही १८ च्या पुढे सरकले आहेत. मात्र इतर उपाययोजनांचे प्रस्ताव पडताळणी व इतर बाबींमुळे अजूनही मंजुरीच्या टप्प्यात नाहीत. निवडणुकीच्या कामांमुळे अधिकाऱ्यांना यात पडताळणीसाठी वेळ मिळाला नाही. या दरम्यान आचारसंहिता लागली अन् त्यानंतर पडताळणीचे अहवालही आले. जवळपास २१ कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेली आहेत. यात पूरक योजना, नळयोजना दुरुस्ती आदी कामांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. टंचाईसाठी आचारसंहिता शिथिल असल्याचे सांगितले जाते. मात्र तरीही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचा हिरवा कंदिल मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.पूर्वी अशा कामांसाठी गुत्तेदारांची लॉबी सक्रिय असायची. मात्र आता खरोखरच जनता टंचाईत होरपळत आहे.प्रशासनाने केलेल्या पडताळणीतही बºयाच ठिकाणी हे समोर आले आहे. किरकोळ कारणांनी या योजना बंद असल्याने शासनाची कोट्यवधींची इतर यंत्रणा मात्र वाया गेल्यात गणती राहात आहे.वेळेत कामे व्हावीतटंचाईतील कामांना आचारसंहितेचा अडसर नसेल तर पुढील पंधरा दिवसांत याबाबतची सगळी प्रक्रिया पूर्ण करून ही कामे केली तर हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाºया ग्रामस्थांना फायदा होईल. त्यासाठी कडक सूचना देण्यासह दिरंगाईत कारवाई करावी लागणार आहे.टंचाईतील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दरवर्षीच विलंब होतो. त्यामुळे ही कामे करण्यासाठी यंत्रणा जवळपास मे महिन्यात प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुढे नजीकच्या काळात पावसाळा लागणार असल्याने ही कामे करणारी गुत्तेदार मंडळीही विविध कारणे सांगून वेळ मारून नेते. त्यामुळे पुढे पावसाळ्यात टंचाई संपते अन् या मंडळींना योजनेबाबत कोणी विचारतच नाही. त्यामुळे टंचाईतील खर्च नाहक वाया जातो. काही तुरळक ठिकाणीच ही कामे वेळेत करून टंचाईत नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम केले जाते.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीRevenue Departmentमहसूल विभाग