शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

न.प.त सभापती निवडीवरून संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:13 AM

गेल्या अनेक वर्षांनंतर येथील नगरपालिकेत नगरसेवकांनी विषय समित्यांच्या निवडीचा आग्रह धरला अन् तो पूर्णत्वासही नेला. मात्र या निवडीत प्रशासनाकडून नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या बाबी सांगण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राजकीय दबावातून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक वर्षांनंतर येथील नगरपालिकेत नगरसेवकांनी विषय समित्यांच्या निवडीचा आग्रह धरला अन् तो पूर्णत्वासही नेला. मात्र या निवडीत प्रशासनाकडून नगरसेवकांना दोन वेगवेगळ्या बाबी सांगण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. राजकीय दबावातून हे कृत्य केले जात असल्याचा आरोप आहे.हिंगोली नगरपालिकेत यापूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्याने विषय समित्या व इतर बाबींसाठी विरोधकांनीही कधी जोर मारला नव्हता. आता नगराध्यक्ष भाजपचा अन् विरोधकांचे प्रबळ संख्याबळ असे चित्र आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सत्तासंघर्षाची ठिणगी पडल्याने वातावरणात गरमाहट आहे. परंतु तरीही विरोधकांना सत्ताधाºयांकडून विविध आघाड्यांवर यशस्वीपणे मात देण्याचे काम सुरू आहे. सत्ता विकेंद्रीकरणासाठी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्याचे ठरले. जिल्हाधिकाºयांनी ३१ जानेवारी रोजी काढलेल्या पत्रानुसार ६ फेब्रुवारीला स्थायी व विषय समित्यांची नेमणूक करण्यास सांगितले होते. त्यासाठी पीठासीन अधिकारीही नेमले होते. हिंगोलीत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर हे पीठासीन अधिकारी होते. त्यांनी विषय समित्यांवरील सर्व सदस्यांची निवड केली. मात्र स्थायीवर नगरसेवकांतून नेमायचे तीन सदस्य निवडले असले तरीही सभापतींची निवड नंतर करावी लागणार असल्याचे सांगितल्याचे नगरसेवकांचे म्हणने आहे. तर न.प.चे जिल्हा प्रशासन अधिकारी सोनवणे यांनी मात्र स्थायी समितीवर सर्व सभापती असतात. त्यामुळे त्यांची निवडही याचवेळी होणे अपेक्षित होते, असे सांगितले. मात्र निवडीच्या दिवशी मी नसल्याने असे का घडले, हे माहिती नसल्याचे सांगितले.समित्यांवरील सदस्य निवड करताना काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मीबाई लांडगे यांना कोणत्याही समितीवर प्रतिनिधीत्व मिळाले नाही. आता सभापती झालेल्यांच्या रिक्त होणाºया जागेवर त्यांना संधी देता येणे शक्य आहे. इतरही काहींना एक तर काहींना तीन-तीन समित्या मिळाल्या आहेत.नगरपालिकेच्या विषय समित्यांवरील सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे त्याच दिवशी या समित्यांच्या सभापतींचीही निवड करण्याची मागणी केली होती. मात्र पीठासीन अधिकारी खेडेकर यांनी कायद्यात तसे नसल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर निवड होईल, असे सांगितले होते. तर न.प. प्रशासन अधिकारी वेगळेच सांगतात. त्यामुळे प्रशासनातच संभ्रम आहे की, राजकीय दबावातून अधिकाºयांनी खेळलेली खेळी, हे कळायला मार्ग नाही, असा आरोपही काँग्रेसचे गटनेते नेहालभैय्या यांनी केला.