शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:48 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे.

कळमनुरी : पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले आहे. सालाने राहूनही मुला-मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे, या चिंतेतून कोंढूर येथील एका मजुराने आपली जीवनयात्रा संपविली.

कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील मजुराच्या हाताला काम मिळत नसल्याने त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील कोंढूर येथे २४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. गळफास घेतलेल्या मजुराचे नाव विठ्ठल गुलाबराव पतंगे (४०) असे आहे. गत काही महिन्यांपासून रोजंदारीचे काम मिळत नाही. काम मिळाले तर रोजंदारीच्या पैशातून घराचा उदरनिर्वाह होत नाही. त्यातून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत हा ताण मयत विठ्ठल पतंगे यांनी मनावर घेतला. मयताचा मुलगा धोंडिबा पतंगे याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली तर मुलगी श्रावणी ही आठवीला शिक्षण घेत आहे. विठ्ठल पतंगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर येऊन ठेपली आहे.

या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे. घरचे अठरा विसवे दारिद्र्य मुलांच्या शिक्षणाला आड येत होते. थोडीबहुत शेती असती तर संसाराला हातभार लागला असता. परंतु त्यांना शेती नव्हती.लोकांचे उसने-पासणे तरी किती दिवस करायचे ही चिंताही नेहमीच त्यांना सतावत असे. आपण दारिद्र्यात जीवन काढले आहे. मुलाला व मुलीला खूप शिक्षण देऊन दारिद्र्यातून बाहेर काढायचे, असे त्यांना वाटायचे. आजमितीस आपण ४० वर्षांचे झालो आहोत. यापुढे मुला-मुलींना शिक्षण द्यायला पैसे मिळतील की नाही? हे काही सांगता येत नाही. या चिंतेतून या मजुराने आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख अन्सार हे करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली