शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:48 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे.

कळमनुरी : पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले आहे. सालाने राहूनही मुला-मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे, या चिंतेतून कोंढूर येथील एका मजुराने आपली जीवनयात्रा संपविली.

कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील मजुराच्या हाताला काम मिळत नसल्याने त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील कोंढूर येथे २४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. गळफास घेतलेल्या मजुराचे नाव विठ्ठल गुलाबराव पतंगे (४०) असे आहे. गत काही महिन्यांपासून रोजंदारीचे काम मिळत नाही. काम मिळाले तर रोजंदारीच्या पैशातून घराचा उदरनिर्वाह होत नाही. त्यातून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत हा ताण मयत विठ्ठल पतंगे यांनी मनावर घेतला. मयताचा मुलगा धोंडिबा पतंगे याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली तर मुलगी श्रावणी ही आठवीला शिक्षण घेत आहे. विठ्ठल पतंगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर येऊन ठेपली आहे.

या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे. घरचे अठरा विसवे दारिद्र्य मुलांच्या शिक्षणाला आड येत होते. थोडीबहुत शेती असती तर संसाराला हातभार लागला असता. परंतु त्यांना शेती नव्हती.लोकांचे उसने-पासणे तरी किती दिवस करायचे ही चिंताही नेहमीच त्यांना सतावत असे. आपण दारिद्र्यात जीवन काढले आहे. मुलाला व मुलीला खूप शिक्षण देऊन दारिद्र्यातून बाहेर काढायचे, असे त्यांना वाटायचे. आजमितीस आपण ४० वर्षांचे झालो आहोत. यापुढे मुला-मुलींना शिक्षण द्यायला पैसे मिळतील की नाही? हे काही सांगता येत नाही. या चिंतेतून या मजुराने आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख अन्सार हे करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली