शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोलिसांची फळविक्रेत्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:46 IST

शहरातील आंबेडकर मार्केटजवळ फळ विक्रेते व पोलिसांत वाद झाला. पोलिसांनी मारहाण केल्याचे फळविक्रेत्यांतून सांगितले जात आहे. हातगाडे उभे करण्याच्या कारणातून हा वाद झाला आहे. सदर घटना २४ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन फळ विक्रेत्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून इतर पाच-सात फळविक्रेते पळून गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत: शहरातील आंबेडकर मार्केटजवळ फळ विक्रेते व पोलिसांत वाद झाला. पोलिसांनी मारहाण केल्याचे फळविक्रेत्यांतून सांगितले जात आहे. हातगाडे उभे करण्याच्या कारणातून हा वाद झाला आहे. सदर घटना २४ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन फळ विक्रेत्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून इतर पाच-सात फळविक्रेते पळून गेले होते.शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने हे २४ मार्च रोजी दहा-बारा पोलिसांसह फळ विक्रेत्यांकडे गेले. यावेळी वाद होऊन पालिसांनी लाठीचार्ज केल्याने यात तिघेजण जखमी झाले. याठिकाणी जवळपास आठ ते दहा फळविक्रेते मागील अनेक वर्षांपासून दररोज फळ विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. मारहाणीनंतर पोलिसांनी फळविक्रेत्यांची सर्व साहित्य तराजू, छत्री टेबले, पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहेत. पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया फळविक्रेते देत आहेत. मारहाण झालेल्या जखमींना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. जखमींमध्ये मोहम्मद जावेद म. गफूर, महंमद मुजीब म. खाजा आणि अब्दुल हाफिज अ. रशीद यांचा समावेश आहे.अब्दुल हाफिज यांना जास्त मार असल्याने हाताच्या बोटामध्ये फ्रॅक्चर झाले आहे. पोलिसांकडून जबाब घेण्यात आला नाही. शिवाय फळविक्रेत्यांना मारहाण केली नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. पोलिसांनी अचानक मारहाण केली. आमची काय चूक होती, हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. माफी मागताना हाताच्या बोटावरही लाठीचार्ज केल्याने बोटे फ्रॅक्चर झाली, असे अब्दुल हाफिज यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी