शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रागामुळेच जवळची माणसे तुटतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:39 IST

राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.राग आणि त्याचा मनावर व शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे माहित असतानाही अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून राग येतोच. परंतु हाच राग किती घातक असतो ! रागाच्या भरात अनेकांकडून गंभीर गुन्हे घडतात. म्हणजेच सामाजिक सलोख्यावरही रागाचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे याच रागाला आता मकरसंक्रांत सणातील गोडव्याच्या साह्याने हद्दपार करून सकारात्मक वाटचालीकडे पाऊल टाकण्याची सर्वांना जणूकाही संधीच असल्याचे मत डॉ.पवार यांनी व्यक्त केले. सणापुरताच गोडवा न राहता तो कायम राहावा हाच संक्रांतीचा उद्देश असतो. परंतु असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आप-आपसातले मतभेद कायमचे विसरण्याचा संकल्प केला पाहिजे. ते म्हणाले, राग आणि चिडचिडेपणामुळे माणसं तुटतात. मानसिक आरोग्य बिघडते. हृदयाचे ठोके वाढून विविध आजार जडतात. गंभीर म्हणजे मेंदूविकार किंवा रक्तदाबाने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवावे, असा वैद्यकीय सल्लाही दिला.रागाच्या भरात झालेल्या नुकसानीची इतिहासात अनेक उदाहरणे असतील. मात्र आज धावपळीच्या जीवनात राग अनेक आजारांना निमंत्रण देते. वैद्यकीय सेवेत असल्याने रोज या बाबी पाहतो. त्यामुळे लोकमतच्या गुड बोला, गोड बोला उपक्रम अंगीकारण्याची खरेच गरज आहे.

टॅग्स :SocialसामाजिकLokmat Eventलोकमत इव्हेंट