शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रागामुळेच जवळची माणसे तुटतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:39 IST

राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.राग आणि त्याचा मनावर व शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे माहित असतानाही अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून राग येतोच. परंतु हाच राग किती घातक असतो ! रागाच्या भरात अनेकांकडून गंभीर गुन्हे घडतात. म्हणजेच सामाजिक सलोख्यावरही रागाचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे याच रागाला आता मकरसंक्रांत सणातील गोडव्याच्या साह्याने हद्दपार करून सकारात्मक वाटचालीकडे पाऊल टाकण्याची सर्वांना जणूकाही संधीच असल्याचे मत डॉ.पवार यांनी व्यक्त केले. सणापुरताच गोडवा न राहता तो कायम राहावा हाच संक्रांतीचा उद्देश असतो. परंतु असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आप-आपसातले मतभेद कायमचे विसरण्याचा संकल्प केला पाहिजे. ते म्हणाले, राग आणि चिडचिडेपणामुळे माणसं तुटतात. मानसिक आरोग्य बिघडते. हृदयाचे ठोके वाढून विविध आजार जडतात. गंभीर म्हणजे मेंदूविकार किंवा रक्तदाबाने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवावे, असा वैद्यकीय सल्लाही दिला.रागाच्या भरात झालेल्या नुकसानीची इतिहासात अनेक उदाहरणे असतील. मात्र आज धावपळीच्या जीवनात राग अनेक आजारांना निमंत्रण देते. वैद्यकीय सेवेत असल्याने रोज या बाबी पाहतो. त्यामुळे लोकमतच्या गुड बोला, गोड बोला उपक्रम अंगीकारण्याची खरेच गरज आहे.

टॅग्स :SocialसामाजिकLokmat Eventलोकमत इव्हेंट