कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूरच्या निवडणुकीसाठी तिसºया दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दोन दिवसात एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे . ...
वसमत- औंढा रोडवर बसच्या वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत. ...
येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी आयोजित पाणीटंचाई बैठक लोकसंख्येच्या चुकीच्या माहितीवरुन प्रारंभीच गोंधळ निर्माण झाल्याने तहकूब करण्यात आली. पुन्हा अचूक माहिती घेवून बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
कयाधू नदीवर शेवाळा येथे उच्चपातळीचा बंधारा बांधण्यासाठी बोअर मारून जमिनीची चाचणी घेण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पी. आर. देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली असून बधाऱ्यासंबंधीची माहितीही देण्यात आली आहे. ...
शहरातील श्रावस्ती बुद्ध विहार आनंदनगर अकोला बायपास येथे १६ डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक भंन्ते धम्मदीप यांनी केले आहे. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांत विविध राजकीय घडामोडींनी वातावरण रंगले होते. त्यातच पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल लागले अन् आता एकदम चिडीचूप परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक झालेल्या या बदलाने सामान्यांना मात्र हायसे वाटत आहे. ...
जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या निधी खर्चातील बाह्य हस्तक्षेपाचे काटे एकदाच दूर होणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढून गाडी रुळावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेत्यांशी संवादाचा पूल उभारण्याचा फंडा आता उपयोगी ठरत असल्या ...
अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले. ...