तालुक्यातील आमला येथील एका घरास आग लागून घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गॅसच्या टाकीने पेट घेतला नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देत होते. ...
जिल्हा रूग्णालयातील रूग्ण व नातेवाईकांचे पिण्याच्या पाण्याविना हाल होत आहेत. रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून आहे. रूग्णालय परिसरातील पाणपोईवर रूग्ण व नातेवाईकांची गर्दी होत आहे. ...
लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडी वगळता कोणाचाही उमेदवार जाहीर झाला नसल्याने जागा कोणत्या पक्षाला जाईल? उमेदवार कोण राहील? याबाबत फेसबूकवर चर्चा झडताना दिसत आहेत. त्यातच मतदारसंघ सेनेऐवजी भाजपला सुटल्याच्या चर्चांनी वातावरण अधिकच गढूळ झाले. ...
मराठवाडा-विदर्भ सीमेवर पैनगंगा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळ अधिकाºयास झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. आपल्या हद्दीत वारेमाप अवैध उपसा होत असताना ही मंडळी दुसऱ्यांच्या हद्दीतील कारभार नेटका करा ...
पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली असल्याने आता टँकरची संख्या वाढली असून १८ वर पोहोचली आहे. तर अधिग्रहणांची संख्या १३0 वर गेली आहे. १0 गावे व २ वाड्यांना सध्या टँकर सुरू झाले आहे. ...
तालुक्यातील साखरा येथील दुकान बंद करुन येलदरीकडे जाणाऱ्या सराफाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांनी पोलीस कोठडीत आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेतील सुरू असलेल्या कामांची संख्या भरमसाठ असली तरीही ती पूर्ण होत नसल्याने निधी खर्चाचे प्रमाणही कमी आहे. कृषी विभागाला या योजनेसाठी १0.७१ कोटी मिळाले आहेत. मात्र विविध यंत्रणांकडून मागणीच येत नसल्याचे चित्र आहे. ...