शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वर्षभरात रुग्णालयात १३६ बालके दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:06 IST

आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मताच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मताच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.एन. आर. एच. एम.च्या माध्यमातून गरोदर मातांसाठी राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काळजी घेतली जाते. त्यामुळे हा कार्यक्रम गरोदर मातांसह बालकांसाठी एक प्रकारची संजीवनीच आहे. या कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांची प्रसुती झाल्यानंतरही तिच्यासह तिच्या बाळाची काळजी घेतली जाते. यामध्ये जवळपास ० ते १८ वयोगटापर्यंतच्या बालकांची तपासणी केली जाते. तसेच बाल सुदृढ जन्माला यावे यासाठी विविध योजनेंतर्गत गरोदर मातांना पोषण आहारही पुरविला जातो. तसेच गरोदर मातांची प्रसुती जवळच्या रुग्णालयातच व्हावी यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. प्रसुती झाल्यानंतरही सदरील माता व चिमुकल्यासह नातेवाईकांना त्यांच्या घरी पोहोचविले जाते. एवढ्या सर्व सुविधा दिल्या जात असल्या तरीही जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात १३६ बालकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एप्रिल ते मार्च २०१७-२८ मध्ये ५ हजार ९३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ हजार ९६ मुले तर २ हजार ८४१ मुलींचा जन्म झाला आहे. तर २.५ पैक्षा ११०० बालकांचा जन्म झाला आहे. बालकांचे कमी वजन व मृत्यूचे प्रमाण रोकण्यासाठी प्रयत्न कुठे होत आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यातच गरोदर मातांना १०८ क्रमांकाच्या अपघाती रुग्णवाहिकेचाही लाभ मिळत आहे. तरीही बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पाहिजे तेव्हढे यश येत नसल्याचे चित्र आहे. आता जिल्ह्यात १३२ एम. बी. बी. एस डॉक्टरांची पदे भरण्यात येत आहेत. त्यामुळे तरी कुठे बालमृत्यूंचा आकडा शुन्य होऊ शकतो.जिल्हासामान्य रुग्णालयात गरोदर मातांची काळजी घेतली जाते. या ठिकाणी पुर्वी गरोदर मातांची हेळसांड होत होती. उपचारासाठी आलेल्या मातांना खाट मिळत होते तर कधी उपचाराविनाच वापस जाण्याची वेळ येत होती. हे सर्व टाळण्यासाठी रुग्णालयात ११ मे पासून अति जोखमींच्या गरोदरमातांसाठी स्वतंत्र वातानुकुलीत कक्ष बनविला आहे. यामध्ये एकाच वेळी चार अति जोखमींच्या गरोदर मातांवर उपचार करता येऊ शकतात. अवघ्या तीन महिन्यांत २०० च्यावर मातांना या कक्षाचा लाभ मिळाला आहे.रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांची रुग्णालयाच्यावतीने काळजी घेतली जाते. या महिलांसाठी स्वतंत्र परिचारीकांची नियुक्तीही केली असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य