शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वर्षभरात रुग्णालयात १३६ बालके दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:06 IST

आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मताच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आरोग्य विभागाच्या वतीने बाल मृत्युचे प्रमाण रोकण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र ह्या महत्वकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचत नसल्याने अजूनही बाल मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. जिल्हासामान्य रुग्णालयात वर्षभरात तब्बल १३६ बालकांचा जन्मताच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.एन. आर. एच. एम.च्या माध्यमातून गरोदर मातांसाठी राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काळजी घेतली जाते. त्यामुळे हा कार्यक्रम गरोदर मातांसह बालकांसाठी एक प्रकारची संजीवनीच आहे. या कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांची प्रसुती झाल्यानंतरही तिच्यासह तिच्या बाळाची काळजी घेतली जाते. यामध्ये जवळपास ० ते १८ वयोगटापर्यंतच्या बालकांची तपासणी केली जाते. तसेच बाल सुदृढ जन्माला यावे यासाठी विविध योजनेंतर्गत गरोदर मातांना पोषण आहारही पुरविला जातो. तसेच गरोदर मातांची प्रसुती जवळच्या रुग्णालयातच व्हावी यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. प्रसुती झाल्यानंतरही सदरील माता व चिमुकल्यासह नातेवाईकांना त्यांच्या घरी पोहोचविले जाते. एवढ्या सर्व सुविधा दिल्या जात असल्या तरीही जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात १३६ बालकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एप्रिल ते मार्च २०१७-२८ मध्ये ५ हजार ९३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ हजार ९६ मुले तर २ हजार ८४१ मुलींचा जन्म झाला आहे. तर २.५ पैक्षा ११०० बालकांचा जन्म झाला आहे. बालकांचे कमी वजन व मृत्यूचे प्रमाण रोकण्यासाठी प्रयत्न कुठे होत आहेत? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यातच गरोदर मातांना १०८ क्रमांकाच्या अपघाती रुग्णवाहिकेचाही लाभ मिळत आहे. तरीही बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पाहिजे तेव्हढे यश येत नसल्याचे चित्र आहे. आता जिल्ह्यात १३२ एम. बी. बी. एस डॉक्टरांची पदे भरण्यात येत आहेत. त्यामुळे तरी कुठे बालमृत्यूंचा आकडा शुन्य होऊ शकतो.जिल्हासामान्य रुग्णालयात गरोदर मातांची काळजी घेतली जाते. या ठिकाणी पुर्वी गरोदर मातांची हेळसांड होत होती. उपचारासाठी आलेल्या मातांना खाट मिळत होते तर कधी उपचाराविनाच वापस जाण्याची वेळ येत होती. हे सर्व टाळण्यासाठी रुग्णालयात ११ मे पासून अति जोखमींच्या गरोदरमातांसाठी स्वतंत्र वातानुकुलीत कक्ष बनविला आहे. यामध्ये एकाच वेळी चार अति जोखमींच्या गरोदर मातांवर उपचार करता येऊ शकतात. अवघ्या तीन महिन्यांत २०० च्यावर मातांना या कक्षाचा लाभ मिळाला आहे.रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांची रुग्णालयाच्यावतीने काळजी घेतली जाते. या महिलांसाठी स्वतंत्र परिचारीकांची नियुक्तीही केली असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य