शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हिंगोलीत हळद संशोधन, प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाबाबत खंडपीठाकडून ‘जैसे थे’चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:14 IST

तत्कालीन शासनाचा निर्णय रद्द करणाऱ्या निर्णयाबाबत आ. राजू नवघरे यांची याचिका

औरंगाबाद : तत्कालीन राज्य सरकारने वसमत येथील ‘मॉडर्न ॲग्रो मार्केट’साठी दिलेली जमीन परत घेऊन, त्या जमिनीवर ‘हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र’ सुरू करण्याच्या विद्यमान राज्य शासनाच्या निर्णयाबाबत पुढील कुठलीही कारवाई करू नये, अशा आशयाचे ‘जैसे थे’ आदेश खंडपीठाने आ. राजू नवघरे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने बुधवारी दिले.

याचिकेत म्हटल्यानुसार तत्कालीन राज्य सरकारने २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयाद्वारे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कन्हेरगाव येथील २६ हेक्टर जमीन ‘मॉडर्न ॲग्रो मार्केट’ या प्रकल्पासाठी दिली होती. या मार्केटच्या उभारणीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव व देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाचे हे महत्त्वाचे पाऊल होते. या प्रकल्पासाठी तत्कालीन राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी अंशदान म्हणून दिला होता. या प्रकल्पांतर्गत अनेक उपक्रम सदरील जागेवर राबविले जाणार होते. या योजनेअंतर्गत जवळपास पाच हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट होते.

परंतु, प्रकल्पाला पीपीपी तत्त्वावर प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी २७ एप्रिल २०२१ रोजी पीपीपीची अट काढून टाकली. यासाठी वसमतचे स्थानिक आ. राजू नवघरे यांनी पुढाकार घेतला होता. प्रकल्पासाठी शासनाकडील उर्वरित साडेसहा कोटी रुपयांची रक्कम काढण्यास परवानगी प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पासाठी जमीन स्वच्छतेबाबतची निविदासुद्धा काढण्यात आली होती.

परंतु, विद्यमान राज्य सरकारच्या १९ सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी दिलेली २६ हेक्टर जमीन शासनाकडे पुन्हा जमा करून घेतली. २२ सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार महसूल विभागाने या जमीन हळद संशोधन आणि प्रक्रिया केंद्र या प्रकल्पासाठी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु, हळद संशोधन केंद्रापेक्षा मॉडर्न ॲग्रो मार्केट या ठिकाणी जास्त उपयुक्त, सोयीस्कर असल्याचे स्थानिक रहिवाशांचे मत आहे. त्यामुळे आ. राजू नवघरे यांनी ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठFarmerशेतकरी