शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शांत राहणे हाच रागावर रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:15 IST

रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड म्हणाले.तुम्मोड म्हणाले, राग हा क्षणिक असतो. तो राग आपण त्या क्षणापुरता थांबवला तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात. तो वेळ टाळून नेला म्हणजे पुढील कटूता टाळता येते. प्रशासकीय सेवेत काम करताना स्वअनुभवानेच सांगायचे तर बऱ्याचदा अपेक्षितरीत्या काम न झाल्यावर राग येतो. मात्र अशावेळी समोरचा अधिकारी-कर्मचारी आधीच दडपणाखाली असल्याने राग करून चालत नाही. त्यामुळे रागावर मात करून मन शांत ठेवून त्यांना चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याची कसरत करावी लागते.माणसाच्या जीवनात प्रसंगानुरुप सर्व प्रकारच्या भावना व्यक्त होण्यासाठी आपोआप उचंबळून येतात. मात्र सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यावर नियंत्रण ठेवल्यासच चांगल्या कामाची उभारणी करता येते. त्यामुळेच सामाजिक स्वास्थ्यही टिकते. हाती घेतलेल्या कामात यश येते. समाजाचाही अशा बाबींना पाठिंबा मिळतो. त्यामुळे यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संयम. ज्याच्याकडे संयम आहे, त्याला कटू प्रसंग टाळणे शक्य होते.लोकमतने गुड बोला, गोड बोला हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. तो प्रत्येकाने अंगिकारावा असे मी आवाहन करतो. शिवाय त्यामुळे एका चांगला सामाजिक बदल दिसून येईल. एकप्रकारे आजच्या काळाची गरज म्हणून हा उपक्रम म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक