शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

शांत राहणे हाच रागावर रामबाण उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:15 IST

रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड म्हणाले.तुम्मोड म्हणाले, राग हा क्षणिक असतो. तो राग आपण त्या क्षणापुरता थांबवला तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात. तो वेळ टाळून नेला म्हणजे पुढील कटूता टाळता येते. प्रशासकीय सेवेत काम करताना स्वअनुभवानेच सांगायचे तर बऱ्याचदा अपेक्षितरीत्या काम न झाल्यावर राग येतो. मात्र अशावेळी समोरचा अधिकारी-कर्मचारी आधीच दडपणाखाली असल्याने राग करून चालत नाही. त्यामुळे रागावर मात करून मन शांत ठेवून त्यांना चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याची कसरत करावी लागते.माणसाच्या जीवनात प्रसंगानुरुप सर्व प्रकारच्या भावना व्यक्त होण्यासाठी आपोआप उचंबळून येतात. मात्र सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यावर नियंत्रण ठेवल्यासच चांगल्या कामाची उभारणी करता येते. त्यामुळेच सामाजिक स्वास्थ्यही टिकते. हाती घेतलेल्या कामात यश येते. समाजाचाही अशा बाबींना पाठिंबा मिळतो. त्यामुळे यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संयम. ज्याच्याकडे संयम आहे, त्याला कटू प्रसंग टाळणे शक्य होते.लोकमतने गुड बोला, गोड बोला हा हाती घेतलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. तो प्रत्येकाने अंगिकारावा असे मी आवाहन करतो. शिवाय त्यामुळे एका चांगला सामाजिक बदल दिसून येईल. एकप्रकारे आजच्या काळाची गरज म्हणून हा उपक्रम म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक