शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
4
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
5
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
6
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
7
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
8
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
9
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
10
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
11
Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
12
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
13
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
14
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
15
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
16
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
17
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
18
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
19
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
20
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
Daily Top 2Weekly Top 5

घनदाट वृक्षलागवडीचे १५ टक्केच उद्दिष्ट गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:32 IST

हिंगोली : जिल्ह्यात घनदाट वृक्षलागवड योजनेचा गाडा मनरेगातून हळूहळू हाकला जात असला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३.५५ लाख रोपट्यांची ...

हिंगोली : जिल्ह्यात घनदाट वृक्षलागवड योजनेचा गाडा मनरेगातून हळूहळू हाकला जात असला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३.५५ लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. जवळपास तीन लाख चौरस मीटर क्षेत्रावर ही लागवड झाली.

हिंगोली जिल्ह्यात यंदा घनदाट वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालयांसह काही यंत्रणांनी यात गेल्यावर्षी चांगले काम केले होते. या वृक्षलागवडीतील बहुतेक रोपटे जिवंत जगल्याचे पाहायला मिळत होते. यंदाही जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली नगरपालिकेने या उपक्रमात हजारो रोपटी जगविल्याचे दिसून येत आहे. जि.प.त गेल्या वर्षीच रोपटी लावली होती. यंदा त्यातील गवत काढायची फुरसतही कोणाला दिसत नाही. मात्र यंदा याच जिल्हा परिषदेने गावपातळीवर ग्रामपंचायतींमार्फत ३ लाख ७ हजार रोपटी लावली आहेत. प्रत्यक्षात २४ लाख ५२ हजार रोपटी लावण्याचे उद्दिष्ट होते. ग्रामीण भागात गायरान जमिनी, शासकीय जागा अथवा वनजमिनींवरही ही लागवड करणे शक्य असताना त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे यासाठी बिहार पॅटर्ननुसार पाणी देण्यास मजूर लावण्यासही वाव आहे. तरीही ही उदासीनता दिसत आहे. निसर्गाचा समतोल बिघडण्यामागे वृक्षतोड हे मोठे कारण असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरीही ग्रामीण भागातही याबाबत बेफिकिरी आहे. पावसाची अनियमितता रोखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची असल्याने ग्रामीण भागात या योजनेला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

ग्रामविकासाच्या इतर यंत्रणांनीही दिलेल्या उद्दिष्टाएवढे काम केले नसल्याचे चित्र आहे. केवळ प्राथमिक शिक्षण विभागाने ९४६ शाळांमध्ये २१ हजार ४९३ रोपटी लावत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले. माध्यमिक शिक्षण विभागास ११ हजारांचे उद्दिष्ट असताना १४९ ठिकाणी २०२२ रोपे लावली. आरोग्य विभागाला १० हजारांचे उद्दिष्ट होते. त्यांनी २८१ ठिकाणी ७,८४६ रोपे लावली. पशुसंवर्धनने ६,२०० उद्दिष्ट असताना ६० ठिकाणी हजार रोपे लावली. बांधकाम विभागाने १३ हजार उद्दिष्ट असताना १० ठिकाणी ६ हजार रोपे लावली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५,८०० च्या उद्दिष्टापैकी ६९५, लघुसिंचनने ७,९०० च्या उद्दिष्टापैकी ९८०, समाज कल्याणने ३,९०० च्या उद्दिष्टापैकी १२५१, महिला व बालकल्याणने ४,४०० पैकी ४०००, तर बचत गटांनी १२५ ठिकाणी २,८७९ वृक्षलागवड केली.

सावली देणारी व फळझाडेही

गावपातळीवर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमध्ये प्रामुख्याने सावली देणारी झाडे निवडण्यात आली होती. याशिवाय फळझाडेही लावली. जेणेकरून त्याचे संगोपन करण्यात लोक पुढाकार घेतील. यात करंज, कडुलिंब, आंबा, गुलमोहर, चिंच या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

गावपातळीवर अशी झाली लागवड

तालुकागावेउद्दिष्टप्रत्यक्ष लागवड

हिंगोली १४४ ४,१९,१७२ १४,४१४

कळमनुरी १४७ ५,३२,२४८ ३३,९३२

वसमत १४६ ५,९४,१४७ ८७,७८५

औंढा ना. १३६ ४१९५७१ ८६९६५

सेनगाव १३७ ४८७६४१ ८३८७८