शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घनदाट वृक्षलागवडीचे १५ टक्केच उद्दिष्ट गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:32 IST

हिंगोली : जिल्ह्यात घनदाट वृक्षलागवड योजनेचा गाडा मनरेगातून हळूहळू हाकला जात असला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३.५५ लाख रोपट्यांची ...

हिंगोली : जिल्ह्यात घनदाट वृक्षलागवड योजनेचा गाडा मनरेगातून हळूहळू हाकला जात असला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३.५५ लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. जवळपास तीन लाख चौरस मीटर क्षेत्रावर ही लागवड झाली.

हिंगोली जिल्ह्यात यंदा घनदाट वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालयांसह काही यंत्रणांनी यात गेल्यावर्षी चांगले काम केले होते. या वृक्षलागवडीतील बहुतेक रोपटे जिवंत जगल्याचे पाहायला मिळत होते. यंदाही जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली नगरपालिकेने या उपक्रमात हजारो रोपटी जगविल्याचे दिसून येत आहे. जि.प.त गेल्या वर्षीच रोपटी लावली होती. यंदा त्यातील गवत काढायची फुरसतही कोणाला दिसत नाही. मात्र यंदा याच जिल्हा परिषदेने गावपातळीवर ग्रामपंचायतींमार्फत ३ लाख ७ हजार रोपटी लावली आहेत. प्रत्यक्षात २४ लाख ५२ हजार रोपटी लावण्याचे उद्दिष्ट होते. ग्रामीण भागात गायरान जमिनी, शासकीय जागा अथवा वनजमिनींवरही ही लागवड करणे शक्य असताना त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे यासाठी बिहार पॅटर्ननुसार पाणी देण्यास मजूर लावण्यासही वाव आहे. तरीही ही उदासीनता दिसत आहे. निसर्गाचा समतोल बिघडण्यामागे वृक्षतोड हे मोठे कारण असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरीही ग्रामीण भागातही याबाबत बेफिकिरी आहे. पावसाची अनियमितता रोखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची असल्याने ग्रामीण भागात या योजनेला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

ग्रामविकासाच्या इतर यंत्रणांनीही दिलेल्या उद्दिष्टाएवढे काम केले नसल्याचे चित्र आहे. केवळ प्राथमिक शिक्षण विभागाने ९४६ शाळांमध्ये २१ हजार ४९३ रोपटी लावत उद्दिष्टापेक्षा जास्त काम केले. माध्यमिक शिक्षण विभागास ११ हजारांचे उद्दिष्ट असताना १४९ ठिकाणी २०२२ रोपे लावली. आरोग्य विभागाला १० हजारांचे उद्दिष्ट होते. त्यांनी २८१ ठिकाणी ७,८४६ रोपे लावली. पशुसंवर्धनने ६,२०० उद्दिष्ट असताना ६० ठिकाणी हजार रोपे लावली. बांधकाम विभागाने १३ हजार उद्दिष्ट असताना १० ठिकाणी ६ हजार रोपे लावली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५,८०० च्या उद्दिष्टापैकी ६९५, लघुसिंचनने ७,९०० च्या उद्दिष्टापैकी ९८०, समाज कल्याणने ३,९०० च्या उद्दिष्टापैकी १२५१, महिला व बालकल्याणने ४,४०० पैकी ४०००, तर बचत गटांनी १२५ ठिकाणी २,८७९ वृक्षलागवड केली.

सावली देणारी व फळझाडेही

गावपातळीवर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमध्ये प्रामुख्याने सावली देणारी झाडे निवडण्यात आली होती. याशिवाय फळझाडेही लावली. जेणेकरून त्याचे संगोपन करण्यात लोक पुढाकार घेतील. यात करंज, कडुलिंब, आंबा, गुलमोहर, चिंच या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

गावपातळीवर अशी झाली लागवड

तालुकागावेउद्दिष्टप्रत्यक्ष लागवड

हिंगोली १४४ ४,१९,१७२ १४,४१४

कळमनुरी १४७ ५,३२,२४८ ३३,९३२

वसमत १४६ ५,९४,१४७ ८७,७८५

औंढा ना. १३६ ४१९५७१ ८६९६५

सेनगाव १३७ ४८७६४१ ८३८७८