शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

केवळ १३५८ ऊसतोड कामगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:27 IST

लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात विविध राज्यांतून ५ हजारांपेक्षाही जास्त ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. मात्र अभियान अंतर्गत केवळ १३५८ कामगारांची नोंद शासन दरबारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात विविध राज्यांतून ५ हजारांपेक्षाही जास्त ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. मात्र अभियान अंतर्गत केवळ १३५८ कामगारांची नोंद शासन दरबारी करण्यात आली.कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी, शासनाकडून नियोजन केले जात नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी कामगार योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. शासनाकडून हिंगोली जिल्ह्यात १९ नोव्हेंबर २०१८ पासून ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’अंतर्गत विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. ऊसतोड कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जरी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले असले तरी, योजनेची माहिती कामगारांना कारखाना सुरू होण्यापूर्वी देणे आवश्यक होते. तसे न झाल्याने योजनेसाठी लागणारे कागदपत्रे सोबत कामगारांनी आणलीच नाहीत. परराज्यात येणाऱ्या ऊसतोड कामगारांनी आधारचा पुरावा सोडला तर इतर कागदपत्रे सोबत नव्हती. त्यामुळे कागदपत्र अभावी अनेकांना नोंद करणे शक्य झाले नाही. या योजने अंतर्गत प्राथमिक टप्प्यामध्ये विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत सुरू असलेल्या घर बांधणी, वृद्धाश्रम व शैक्षणिक योजनांकरिता संबंधित प्रशासकीय विभागांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.घरबांधणी योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई नागरी, ग्रामीण आवास योजना इ. योजनांचा प्रथम टप्प्यात समावेश आहे. शैक्षणिक योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जातीकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांचा समावेश आहे.जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगार विशेष नोंदणी अभियानची अंमलबजावणी करण्यात आली. ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी दोन पथकाद्वारे कामगार ज्या ठिकाणी आहेत तेथे जाऊन नोंदणी करण्यात आली. विशेष नोंदणी अभियान राबवून जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील १३५८ ऊसतोड कामगारांची नोंदणी पथकाने करून घेतल्याची माहिती एन. एस. भिसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ज्या कामगारांची अभियानात नोंदणी करण्यात आली आहे, त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यातील चार ठिकाणच्या साखर कारखान्यावर जाऊन तेथील ऊसतोड कामगारांची नोंदणी पथकाद्वारे करण्यात आली. नोंदणीसाठी आधार, पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, फोटो ही कागदपत्रे घेतली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी