शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शाॅर्टसर्किटने काढणीचा दीड एकरातील गहू जळून खाक

By रमेश वाबळे | Updated: March 3, 2025 17:09 IST

काढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव (सोळंके) शिवारात शाॅर्टसर्किटने आग लागून दीड एकरातील गहू जळून खाक झाल्याची घटना ३ मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.

हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील शेतकरी वंदना उत्तम दिपके यांचे शेत येहळेगाव (सोळंके) शिवारातील गट क्रमांक १९७ मध्ये आहे. त्यांनी दीड एकरात गहू पेरला होता. हा गहू काढणीला आला असताना ३ मार्चला दुपारी शेतातून गेलेल्या वीज तार वाऱ्यामुळे एकमेकांना चिकटल्या आणि ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या वाळलेल्या गव्हावर पडल्याने आग लागली. दुपारची वेळ असल्यामुळे प्रखर ऊन आणि वाऱ्याचा वेग असल्यामुळे काही क्षणांतच आग झपाट्याने पसरली.

शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जवळपास दीड एकरातील गहू जळून खाक झाला. या शेतात जवळपास २५ क्विंटल गव्हाचे उत्पादन होणार होते. आता मात्र क्विंटलभरही गहू निघणार नसल्याने शेतकरी महिला वंदना उत्तम दिपके यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती महावितरण, महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

हातातोंडाशी आलेला घास हिरावलाकाढणीसाठी आलेला दीड एकरांतील गहू शाॅर्टसर्किटने जळून खाक झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन घटले. बाजारपेठेत भावही समाधानकारक मिळाला नसल्याने लागवडखर्चही वसूल झाला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी महिला वंदना दिपके यांचा गहू जळाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. महावितरण कंपनी, महसूल विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली